दानवेंचा तोल सुटला, केली शेतकऱ्यांची अर्वाच्य शद्बांत अवहेलना

  भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि वादाचं जवळचं नातं असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय... 

Updated: May 10, 2017, 07:10 PM IST
 दानवेंचा तोल सुटला, केली शेतकऱ्यांची अर्वाच्य शद्बांत अवहेलना title=

जालना :   भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि वादाचं जवळचं नातं असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय... 
   
तूर,ऊस, बाजरी खरेदी आणि कर्जमाफी हे विषय आता बंद करा अशा शब्दात रावसाहेब दानवेंनी आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना सुनावलंय. 
   

पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या  उद्घाटनानंतर कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्यांनी आपल्या तोंडाचा पट्टा चालवला. एवढंच नव्हे तर तूर खरेदीला पुन्हा परवानगी दिल्यानंतरही रडारड सुरूच असल्याचं सांगत अर्वाच्य शब्दात शेतक-यांची अवहेलना केली. 
   
दानवेंच्या मनात शेतक-यांबाबत कमालीचा राग असल्याचंच त्यांच्या या वक्तव्यातून दिसून आलं. शेतक-यांबाबत यापुढे प्रश्न ही विचारू नका असा दमही त्यांनी कार्यकर्त्यांना भरला. दानवेसाहेब शेतक-यांना न्याय देता येत नसेल तर निदान शिव्या तरी देऊ नका...