अपहरण केलेल्या त्या तिन्ही तरुणांची सुटका

 पुण्यातून छत्तीसगडला अपहरण झालेल्या तिन्ही तरुणांची सुखरुप सुटका झालीय.

Updated: Jan 3, 2016, 03:39 PM IST
अपहरण केलेल्या त्या तिन्ही तरुणांची सुटका title=

पुणे : पुण्यातून छत्तीसगडला अपहरण झालेल्या तिन्ही तरुणांची सुखरुप सुटका झालीय. पाच दिवसांपूर्वी श्रीकृष्ण शेवाळे, आदर्श पाटील, आणि विकास वळवे या तिघांचं अपहरण करण्यात आलं होतं. 

छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात बसगुड्डामधून नक्षलवाद्यांनी या तरुणांचं अपहरण केलं.  आज सकाळी या सर्वांची चिंतलनार कॅम्पमध्ये यातिघांनाही सोडण्यात आलं. पुण्यात हे तिघे जण भारत जोडो यात्रेसाठी सायकलवर छत्तीसगडमध्ये गेले होते. 

भारत जोडो अभियाना अंतर्गत शांतिचा संदेश देण्यासाठी पुण्यातून छत्तीसगडमार्गे ओडिशातील मलकानगिरी येथे जाण्यासाठी हे तरुण सायकलनं 20 डिसेबरला पुण्याहून निघाले होते. 10 जानेवारीला ते मलकानगिरी येथे भारत जोडो यात्रेत पोहोचणार होते.