मुख्यमंत्री साधणार जनतेशी संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पावलावर पाऊल टाकत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जनतेशी संवाद साधणार आहेत. मी मुख्यमंत्री बोलतोय हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 

Updated: Mar 31, 2017, 10:17 AM IST
मुख्यमंत्री साधणार जनतेशी संवाद title=

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पावलावर पाऊल टाकत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जनतेशी संवाद साधणार आहेत. मी मुख्यमंत्री बोलतोय हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 

राज्याचं माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय या कार्यक्रमाची निर्मिती करणार आहे. पहिल्याच कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस संकल्प शाश्वत शेतीचा या विषयावर जनतेशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमात जनतेला थेट मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारता येणार आहेत. 

जनतेच्या मनातील सगळ्या आणि शंका तसंच प्रश्नांना मुख्यमंत्री या कार्यक्रमाच्या माध्यमातून उत्तरं देतील.  मुख्यमंत्र्यांना तुम्हालाही काही प्रश्न विचारायचे असतील तर ते प्रश्न तुम्हीसुद्धा ते पाठवू शकता. त्यासाठी तुम्हाला तुमचे प्रश्न av.dgipr@maharashtra.gov.in वर मेल करु शकता. 

तसंच राज्य सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या व्हॉट्स ऍप नंबरवरही तुमचे प्रश्न पाठवू शकता. प्रश्न पाठवण्याची अंतिम मुदत ही ३ एप्रिल आहे. मात्र तुमच्या प्रश्नांना उत्तरं देणारा हा कार्यक्रम कधी प्रसारित होणार हे मात्र अद्याप जाहीर करण्यात आलेलं नाही.