राज्यात ४ हजार २६४ कोटींचा डाळ घोटाळा?

राज्यात ४ हजार २६४ कोटींचा डाळ घोटाळा झाल्याचा आरोप महाराष्ट्र ग्राहक पंचायतीनं केला आहे. तशा आशयाचं पत्रच ग्राहक पंचायतीनं मुख्यमंत्र्यांना पाठवलंय. 

Updated: Dec 3, 2015, 06:38 PM IST
राज्यात ४ हजार २६४ कोटींचा डाळ घोटाळा? title=

मुंबई : राज्यात ४ हजार २६४ कोटींचा डाळ घोटाळा झाल्याचा आरोप महाराष्ट्र ग्राहक पंचायतीनं केला आहे. तशा आशयाचं पत्रच ग्राहक पंचायतीनं मुख्यमंत्र्यांना पाठवलंय. 

तर ग्राहक पंचायतीचा हा आरोप गंभीर असल्याचं सांगत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी या प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे. 

शासकीय स्तरावर व्यापाऱ्यांशी संगनमत करूनच साठेबाजी आणि नफेखोरीला मोकळं रान दिलं गेल्याचं ग्राहक पंचायतीनं म्हटलंय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.