सुरेश रैनाने यांना का निमंत्रण दिले नाही?

क्रिकेटर सुरेश रैनाच्या लग्नाचा डंका कित्येक दिवस वाजत होता. रैनाने खास मित्रमंडळी, मान्यवर यांना लग्नाला बोलावले होते. मात्र, आपल्या मामाला लग्नात स्थानच दिले नसल्याचे पुढे आले आहे. परंपरेनुसार लग्न समारंभात मामाला महत्व असते. मात्र, रैनाने याला फाटा फोडला.

Updated: Apr 4, 2015, 08:21 PM IST
 सुरेश रैनाने यांना का निमंत्रण दिले नाही? title=

दिल्ली : क्रिकेटर सुरेश रैनाच्या लग्नाचा डंका कित्येक दिवस वाजत होता. रैनाने खास मित्रमंडळी, मान्यवर यांना लग्नाला बोलावले होते. मात्र, आपल्या मामाला लग्नात स्थानच दिले नसल्याचे पुढे आले आहे. परंपरेनुसार लग्न समारंभात मामाला महत्व असते. मात्र, रैनाने याला फाटा फोडला.

उत्तराखंडमध्ये लग्नसमारंभात मामाला खूप महत्व असतं. मामाचं लग्नात असनं गरजेचे असते. मात्र सुरेश रैनाच्या लग्नात त्याने चक्क त्याच्या मामालाच बोलवले नाही. रैमाचे मामा हिमाचल प्रदेशातील कांगडा येथे राहतात. जेव्हा त्यांना रैनाच्या लग्नाबद्दल विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी सांगितले की रैनाच्या लग्नाबद्दल मी खूप आनंदी आहे. त्यांनी मी रैनाच्या लग्नात जाऊ शकत नाही याबद्दल दु:खही व्यक्त केले.

रैनाच्या मामांनी सांगितले की, कोणीही नातेवाईक या लग्नात सहभागी होऊ नये, अशी रैनाची इच्छा होती. त्यामुळे रैनाच्या आई-वडिलांनी कोणालाही आमंत्रण दिले नाही. सुरेश रैनाने लग्नात फक्त कुटुंबातील काही खास सदस्य, राजकारणी, क्रिकेट आणि सिनेजगतातील मान्यवर व्यक्तींना आमंत्रित केले होते.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.