मुक्तिधाम…. वेदनेचा अंत

जीवन आणि मृत्यू. जगातील दोन शाश्वत सत्ये..!! एकाच नाण्याच्या दोन बाजू..!! असं म्हणतात की या जगात जन्माला येण्याचा फक्त एकच मार्ग आहे; पण मरण मात्र अनेक मार्गांनी येऊ शकते.

Updated: Jan 19, 2012, 09:23 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

रश्मी पाटकर

रंगलेल्या मैफिलीला वेदनेची साथ आहे,

सरत आल्या भैरवीचा वेदनाच श्वास आहे,

     पैलतीरीच्या शांततेची मग लागलेली आस आहे..,

    मार्ग मुक्तीचा सुखी असावा हा त्यांचा ध्यास आहे..

 

 

जीवन आणि मृत्यू. जगातील दोन शाश्वत सत्ये..!!  एकाच नाण्याच्या दोन बाजू..!! असं म्हणतात की या जगात जन्माला येण्याचा फक्त एकच मार्ग आहे; पण मरण मात्र अनेक मार्गांनी येऊ शकते. माणूस जीवनावर प्रेम करतो,पण कधी कधी माणसाला आयुष्यात एवढा त्रास सहन करावा लागतो की त्याला जगण्यापेक्षा मरण जास्त सोयीस्कर वाटायला लागते. पण दुर्दैवाने त्याला येणारा मृत्यूसुध्दा सहजासहजी येत नाही. येताना सोबत अजून वेदना घेऊन येतो. अशा मृत्यूच्या अनेक मार्गांपैकी एक म्हणजे “कर्करोग”.

 

या रोगाच्या नावातच त्याच्याबरोबर येणारे त्रास लपलेले आहेत. कर्क म्हणजे खेकडा. खेकडा जसा वाळू पोखरत जातो अन् त्याची पकड जशी मजबूत असते तसाच हा रोग, रोग्याचे शरीर पोखरत जातो. कितीही उपाय केले तरी तो आपली पकड सोडत नाही. कर्करोग्याला प्रचंड हाल सहन करावे लागतात. पण जेव्हा सगळे उपाय थकतात तेव्हा डॉक्टर अशा रूग्णाला “TERMINALLY ILL”  म्हणजे कायमस्वरूपी रूग्ण म्हणून घोषित करतात. वेदना तर प्रचंड होत असतात पण उपाय मात्र करता येत नाही आणि मरावं म्हटलं तर मरण लवकर येत नाही अशा कात्रीत सापडलेला तो रूग्ण त्याच्या घरच्यांसाठी एक दुखरी नस होऊन जातो. मग अशा रूग्णांनी जायचं कुठे..?? हाच प्रश्न बहुधा व्यवसायाने कर्करोग शल्यविशारद म्हणजे कॅन्सर सर्जन असलेल्या डॉ.ल्युसीटो यांना पडला आणि त्यातूनच जन्म घेतला “शांती अवेदना सदन” या संस्थेने.

 

दिनांक २ नोव्हेंबर १९८६ रोजी डॉ.ल्युसीटो यांनी “शांती अवेदना सदन” या आश्रमाची स्थापना केली. वांद्रयाला माउंट मेरीच्या चर्चसमोरच हा सदन उभा आहे. या संस्थेच्या नावातच तिचे कार्य लपलेले आहे. रोगाने सगळे शरीर पोखरलेल्या, असह्य वेदनांनी गलितगात्र झालेल्या आणि मरणाची वाट पाहत जगणाऱ्या रूग्णांची येथे सेवा केली जाते. डॉ.ल्युसीटो यांच्या मते हा सदन म्हणजे रूग्णालय नाही किंवा नर्सिंग होम सुध्दा नाही कारण इथे बरे होण्याचे काहीच उपाय केले जात नाहीत. कर्करोगावरचे सर्व उपाय करून झाल्यावर सुध्दा जेव्हा रोग्याचे मरण डॉक्टरांना निश्चीत दिसत असते तेव्हा अशा रूग्णासाठी ते एक शुश्रूषालय म्हणून काम करतो. इथे कर्करोग्यांना मरणाचा मार्ग सुकर व्हावा यासाठी प्रयत्न केले जातात. अशा रूग्णांसाठी सदन असणे ही संकल्पनाच खूप अभिनव आहे. आजच्या जगात जिथे जिवंत माणसाची काळजी घेण्यासाठी कोणाला वेळ नाही, तिथे मरणाऱ्या माणसाला कोण विचारतो. म्हणूनच डॉ.ल्युसीटो यांचे कार्य खूप कौतुकास्पद ठरते.

 

डॉ. ल्युसीटो यांच्या मार्गदर्शनाखाली १५ नन्स हा सदन बघतात. आपल्या शरीरात कर्करोगाच्या पेशी असतात पण कधी-कधी काही माणसांच्या शरीरात त्यांची अवास्तव वाढ होऊ लागते. ह्या वाढीला विशिष्ट कारणे असतात पण अजून तरी ती कारणे वैद्यकीय शास्त्राला अनभिज्ञ आहेत. ह्या पेशी रक्तातून शरीरात सर्वत्र संचार करतात. मग त्या एखाद्या विशिष्ट अवयवांच्या मूलपेशींशी जाऊन चिकटतात आणि स्वत:ची वाढ करू लागतात. ही फाजील वाढ कधी कधी ट्युमरच्या स्वरूपात दिसून येते. म्हणजेच ट्युमर हा कर्करोगाचे प्राथमिक स्वरूप असु शकतो. तो केमोथेरपी किंवा शस्त्रक्रियेने काढून टाकता येतो. पण कर्करोगाच्या पेशी कधीच पूर्णत: नष्ट करता येत नाहीत. ट्युमर काढून टाकलेल्या माणसाला सुध्दा भविष्यात पुन्हा तोच त्रास होऊ शकतो. कर्करोगाचे निदान जर अगदी प्राथमिक अवस्थेत झाले तरच तो बरा होऊ शकतो. कर