'बिच्चारा' गंभीर...

श्रीलंकेसोबत सुरू असलेल्या वन डे मॅचमध्ये भारताला पाचवा धक्का बसला आहे. सलामीचा बॅट्समन गौतम गंभीर ९१ रनवर रनआऊट झाला. कुलशेखराने त्याला रनआऊट केले.

Updated: Feb 14, 2012, 05:17 PM IST

www.24taas.com, अॅडलेड

 

श्रीलंकेसोबत सुरू असलेल्या वन डे मॅचमध्ये भारताला पाचवा धक्का बसला आहे. सलामीचा बॅट्समन गौतम गंभीर ९१ रनवर रनआऊट झाला. कुलशेखराने त्याला रनआऊट केले. गंभीरने १०६ बॉलमध्ये ९१ रन केले. त्या ६ फोरचा समावेश होता. तर गेल्या ऑस्ट्रेलिया सोबत झालेल्या वन डे मध्ये तो ९२ रनवर आऊट झाला होता.

 

लाईव्ह स्कोअर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

 

लागोपाठ दोनही वन डे मॅचमध्ये गंभीर शतकाजवळ पोहचून शतकांची मजा चाखू शकला नाही. दोन्हीवेळी गंभीरला शतकाने हुलकावणी दिली. मात्र त्याने मॅच जिंकून देण्याच्या अपेक्षा जिवतं ठेवल्या आहेत. भारताला जिंकण्यासाठी ४३ बॉलमध्ये आणखी ५६ रनची गरज आहे. धोनी ३१ रनवर खेळतो आहे तर जडेजा १ रनवर खेळतो आहे.

 

भारत २३६ रनचा पाठलाग करताना ४ विकेट गमवल्या असल्या तरी गंभीरने मात्र आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे. गेल्या सामन्यात त्यांचे शतक काही होऊ शकले नव्हते. गंभीर एक बाजू लावून धरली आहे. थोड्या थोड्या अंतराने भारताच्या विकेट जात असताना गंभीरने संयमी खेळी खेळत आहे. ६० बॉलमध्ये त्याने अर्धशतक पूर्ण केले त्यात ४ फोरचा समावेश आहे.

 

भारत वि. श्रीलंका सुरू असलेल्या वन डे मॅचमध्ये २३६ रनचा पाठलाग करताना भारताने आतापर्यंत १०२ रन करून तीन विकेट गमावल्या आहेत. सचिन आणि गंभीर यांनी डावाला सुरवात केली. पण गेल्या काही सामन्याप्रमाणेच सचिनने पुन्हा एकदा सगळ्यांची निराशच केली. तो फक्त १५ रन करून माघारी परतला. त्याला  कुलशेखराने आऊट केले. त्यानंतर आलेला विराट कोहली हा देखील कमाल करू शकला नाही. त्याला परेराने एलबीडब्लू केलं तो १५ रनवर आऊट झाला. तर रोहित शर्मा हा देखील १५ रनवरच रन आऊट झाला. तर रैना फक्त ८ रनवर आऊट झाला

 

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या ट्राय सीरीजमध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यादरम्यान आज दुसरी वन डे अॅडलेडमध्ये सुरू आहे. टॉस जिंकून श्रीलंकेने प्रथम बॅटींग करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारतीय बॉलरनी श्रीलंकेला २३६ रनवरच रोखलं, त्यामुळे भारताला विजयासाठी २३७ रनची गरज आहे.

 

गेल्या काही मॅचमध्ये टीम इंडियाच्या फिल्डिंगचा दर्जा सुधारला आहे. त्यामुळे टीम इंडियाला याचा मोठा फायदा झाला आहे. आज देखील इंडियाने चांगली फिल्डिंग करत श्रीलंकेच्या ३ बॅट्समनला रनआऊट केले. त्यामुळे ५० ओव्हर मध्ये ९ विकेट गमावून श्रीलंकेने २३६ रनपर्यंतच मजल मारली. श्रीलंकेकडून चंदीमलने सर्वाधिक ८१ रनची खेळी केली. तर भारताकडून विनयकुमारने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या.

 

चौथ्यापाठोपाठ श्रीलंकेची पाचवी विकेटही गेली आहे. रोहित शर्माच्या बॉलिंगवर चांडिमल ८१ रन्सवर धोनी तर्फे झेलबाद झाला आहे.  श्रीलंकेची चौथी विकेट गेली. विनय कुमारच्या बॉलिंगवर महेला जयवर्धने ४३ रन्सवर पायचित झाला. श्रीलंकेचा स्कोअर १८१/५ असा आहे.याआधी  आर. अश्विनच्या बॉलिंगवर गौतम गंभीरने कुमार संगकाराचा झेल पकडला होता. यापूर्वी   झटपट धावा काढण्याच्या नादात दिलशान तिलकरत्ने इर्फान पठाणच्या बॉलिंगवर धोनीकरवी झेलबाद झाला. श्रीलंकेची पहिली विकेट उपुल थरंगा एकही धाव न घेता आऊट झाला. विनय कुमारच्या बॉलिंगवर धोनीने विकेट घेतली होती. 

 

सीबी सीरिजमध्ये टीम इंडिया विजय़ी ट्रॅकवर परतली आहे. ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर आता श्रीलंकेला रोखण्याच टीम इंडियाला आव्हान आहे. कांगारूंना पराभवाचा धक्का दिल्यानंतर धोनी अँड कंपनीचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे लंकेला पराभूत करून टेबल टॉपर बनण्याची टीम इंडियासमोर नामी संधी आहे. रोमहर्षक लढतीमध्ये टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का दिला होता. या मॅचमध्ये भारतीय बॅट्समनची बॅट चांगलीच तळपली.

 

श्रीलंकेला या सीरिजमध्ये आत्तापर्यंत एकही विजय मिळवता आलेला नाही त्यामुळे पहिल्या विजायाची नोंद करण्यासाठी जयवर्धनेची टीम प्रयत्नशील असेल. लसिथ मलिंगावर त्यांची बॉलिंगची भिस्त असेल. तर बॅटिंगमध्ये तिलकरत्ने दिलशान आणि कुम