मॅचमध्ये पावसाने घातला खोडा...

भारत- ऑस्ट्रेलिया सिडनीतील टी-२०मॅचमध्ये पावसाने व्यत्यय आणला आहे. त्याआधी ऑसी बॅट्समनने तुफानी बॅटींग करून टीम इंडिया समोर तगडं आव्हान ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.

Updated: Feb 1, 2012, 05:28 PM IST

www.24taas.com, सिडनी

 

भारत- ऑस्ट्रेलिया सिडनीतील टी-२०मॅचमध्ये पावसाने व्यत्यय आणला आहे. त्याआधी ऑसी बॅट्समनने तुफानी बॅटींग करून टीम इंडिया समोर तगडं आव्हान ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. पावसाने व्यत्यय आणण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाने १४.४ ओव्हरमध्ये १३१ रन्सपर्यंत मजल मारली आहे. तर त्याबदल्यात फक्त दोन विकेट गमावल्या.

 

मॅचचा LIVE स्कोर जाणून घेण्यासाठी क्लिक करा.

 

वेड याने  फक्त ४१ बॉल्समध्ये ७० रन काढले त्यात त्याने ४ फोर आणि ३ सिक्स हाणले, भारतीय गोलंदाजांपैकी राहुल शर्मा आणि विनयकुमार यांनी प्रत्येकी १ - १ विकेट घेतले. पण आर अश्विन, प्रविण कुमार, रविंद्र जडेजा यांच्या बॉलिंगवर ऑसी बॅट्समनने अक्षऱश धावा लुटल्या. सामना थांबविण्यात आला तेव्हा  वेड ७० रन आणि डेव्हिड हस्सी १७ रनवर खेळत होते.

 

सिडनीत भारत - ऑस्ट्रेलिया मध्ये पहिल्या टी-२० आज सुरवात झाली. नाणेफेक जिंकून आज प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय कॅप्टन धोनीने घेतला. सिडनीतील वातावरण पाहता भारतीय बॉलर्सला वातावरणाचा फायदा मिळावा यासाठी भारताने पहिले फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता.  मात्र डेव्हिड वार्नर आणि वेड यांनी चांगली सुरवात केली.

 

मात्र विनयकुमारने डेव्हिड वॉर्नरला सुरेश रैना करवी कॅचआऊट करून त्याचा अडसर दूर केला. वॉर्नरने १४ बॉलमध्ये २१ रन केले त्यात १ फोर आणि २ सिक्सचा समावेश होता. पण त्यानंतर आलेल्या ब्रटला सोबत घेऊन वेड यांने धडाकेबाज फटकेबाजी केली. पण ब्रट १७ रन्सवर असताना राहुल शर्माने त्यांचा बळी घेतला. वेड मात्र अजूनही चांगली बॅटींग करत आहे. त्याने ३६ बॉलमध्ये आपले अर्धशतक झळकावले आहे. त्यात ४ फोर आणि २ सिक्सचा समावेश आहे.

 

दहा ओव्हर नतंर ऑस्ट्रेलियाने ८० रन पर्यंत मजल मारली होती. त्यामुळे आता ऑस्ट्रेलिया मोठी धावसंख्या उभारण्याचा दृष्टीने प्रयत्न करेल. तर मात्र भारतीय बॉलर्सला त्यांना कमीत कमी रनमध्ये रोखणाचं आव्हान असणार आहे.

 

ऑस्ट्रेलिया :  131/2 

इंडिया : ओव्हर (14.4)