12 अफेयर! ब्रेकअप, घटस्फोट, 53 वर्षीय अभिनेत्रीच्या अयशस्वी प्रेमाच्या वेदना; म्हणाली - 'मी चुकीच्या पुरुषांसोबत...'

Entertainment : वयाच्या 53 वर्षीय ही अभिनेत्री आजही एकटी आहे. असं नाही की तिने लग्न केलं नव्हतं. पण ते लग्न फार काळ टिकल नाही.  प्रेमात विश्वासघात, ब्रेकअप, लग्न आणि नंतर घटस्फोट एवढंच नाही तर कॅन्सरशी दोन हात करुन ती आज खंबीरपणे उभी आहे.   

| Jul 14, 2024, 15:27 PM IST
1/7

आम्ही बोलत आहोत मनिषा कोईराला हिचाबद्दल. तिने नुकतच फिल्मफेअरसोबत संवाद साधला. ज्यामध्ये तिने आपल्या आयुष्यातील वेदना बोलून दाखवल्यात. ती म्हणाली की, 'माझ्या लक्षात आलं की मी फक्त चुकीच्या पुरुषांच्याच प्रेमात का पडते? मी हे पुन्हा पुन्हा का करत आहे, असा प्रश्न मला पडला. माझ्यात काहीतरी चूक आहे की मी फक्त सर्वात त्रासदायक किंवा चुकीच्या व्यक्तीकडे आकर्षित होतो. तेव्हा मी अंतर्मनात झाकून पाहिल. मला ज्या गोष्टीचा त्रास होता त्यावर मी निर्णय घेतला आणि त्यावर काम केलं.

2/7

मनिषा म्हणते की, 'ती आता एकटी आहे, पण तिला आता कोणाशीही संबंध ठेवायचं नाहीत. आता ती कोणाशी बोलणे आणि समाजकारणही टाळते. ती म्हणाली, 'गेल्या 5-6 वर्षांपासून मी एकटी आहे आणि सध्या मी कोणाशीसोबतही मिसळण्याच्या मनस्थितीत नाही. मला अजूनही वाटते की मला स्वतःवर खूप काम करावं लागणार आहे.'

3/7

'वारंवार वाईट नात्यात आल्यानंतरही तिचा प्रेमावरील विश्वास उडाला नाही. तिला आशा आहे की तिला एक चांगला आणि खरा जोडीदार मिळेल जो तिला समजून घेईल आणि त्यांच्याशी प्रामाणिक राहिल.'

4/7

 'मला एक चांगले नातं जगायच आहे, ज्यात मला वाटतं की आम्ही दोघे एकमेकांना स्विकारलंय. एकमेकांशी प्रामाणिक असू.  खरं तर पुढे जाण्यासाठी आपल्याला काय शिकले पाहिजे हे समजून घेणे खूप महत्वाचे आहे. आपल्या प्रवासात आपण एकमेकांना साथ देऊ शकतो की नाही हे देखील महत्त्वाचे आहे. मला स्वप्नं, महत्वाकांक्षा आणि आवड असलेल्या व्यक्तीसोबत राहायचं आहे कारण मी खूप भावनिक व्यक्ती आहे.'

5/7

मनिषा पुढे म्हणाली की, 'जेव्हा ती चित्रपटात आली तेव्हा ती बाहेरच्या जगातील होती. ती निर्दोष होती. एकामागून एक संकटांना सामोरे जात असताना तिला योग्य आणि अयोग्य यातील फरक समजला. ती म्हणाली, मी बाहेरची कलाकार होते, नेपाळहून आले होते. मला बरोबर की चूक कळत नव्हतं. माझा एकटेपणा प्रियकर किंवा जोडीदार भरून काढू शकतो असे मला वाटायचं, पण तसं कधी झालं नाही. ती सगळी माणसं नात्याबद्दल खूप रोमँटिक बोलत असत. प्रत्येक वेळी मी त्यांना माफ करून पुढे जायचं. कालांतराने आणि वयानुसार, मला जाणवले की मी माझ्या आजूबाजूला अनेक अनावश्यक लोक एकत्र केलीत.' 

6/7

90 च्या दशकात जेव्हा मनिषाचे करिअर शिखरावर होतं तेव्हा तिचं नाव जवळपास 12 लोकांशी जोडले गेलं होतं. ती चित्रपटसृष्टीव्यतिरिक्त इतर क्षेत्रांशी संबंधित होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बिझनेसमन सम्राट दहलसोबत लग्न करण्यापूर्वी मनिषाचे नाव विवेक मुशरन, नाना पाटेकर, डीजे हुसैन, नायजेरियन बिझनेसमन सेसिल अँथनी, आर्यन वैद, प्रशांत चौधरी, ऑस्ट्रेलियाचे राजदूत क्रिस्पिन कॉनरॉय यांच्याशी जोडलं गेलं होतं. 

7/7

प्रेमात वारंवार फसवणूक झाल्यानंतर तिने नेपाळी उद्योगपती सम्राट दहलशी लग्न केलं. जे 2012 मध्ये तिच्या पतीपासून घटस्फोट घेतल्यापासून ती आज एकटीच जीवन जगत आहे. मात्र, ती अजूनही खऱ्या प्रेमाचा शोधात असल्याच ती बोलतेय.