लाड संपले, मैदानात या; वर्ल्ड कप जिंकला तरी BCCI ने 'या' खेळाडूंवर लादली नकोशी अट

BCCI On Domestic Cricket : टीम इंडियाने टी-ट्वेंटी वर्ल्ड कपवर नाव कोरलं अन् इकडे बीसीसीआयने रोहितसेनेचं जल्लोषात स्वागत केलं. आता वर्ल्ड कप विजेत्यांचे लाड संपले आहेत.

| Jul 16, 2024, 17:59 PM IST
1/5

वर्ल्ड कप

वर्ल्ड कप जिंकून पांधरवडा झाला तरी देखील चाहत्यांच्या मनातील आनंद अजूनही कमी झाला नाही. अशातच खेळाडूंचा आनंद देखील गगनात मावेना झालाय.

2/5

बीसीसीआय

अशातच आता बीसीसीआयने 'पुरे झाले लाड' म्हणत खेळाडूंनी पुन्हा मैदानात येण्याचं आवाहन केलंय. बीसीसीआयने वर्ल्ड कप विनर खेळाडूंना आदेश दिले आहेत.

3/5

देशांतर्गत क्रिकेट

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, वर्ल्ड कप टीममधील स्टार क्रिकेटपटूंनी देशांतर्गत क्रिकेटसाठी स्वत:ला उपलब्ध करून द्यावं, अशी बीसीसीआयची इच्छा आहे. 

4/5

या खेळाडूंना सुट

बीसीसीआयने रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह या खेळाडूंना सुट दिली आहे. त्यांची इच्छा असेल तर ते स्वत: निर्णय घेतली, असं बीसीसीआयने ठरवलंय.

5/5

युवा खेळाडूंची परीक्षा

दरम्यान, टीम इंडियामधील सिनियर खेळाडूंना आराम दिल्याने आता युवा खेळाडूंची खरी परीक्षा सुरू झाली, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.