WTC मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया, मग अंतिम सामना इंग्लंडमध्ये का? समोर आलं मोठं कारण

WTC Final : दोन वर्ष कसोटी क्रिकेटमध्ये (Test Cricket) चांगली कामगिरी करत टॉपवर असणाऱ्या दोन संघांमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (WTC) अंतिम सामना खेळवला जातो. यात विजेती टीम टेस्ट चॅम्पियन ठरते. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या पहिल्या हंगामात भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) टीम आमने-सामने होत्या. तर दुसऱ्या हंगामात भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान (India vs Australia) अंतिम सामना खेळवला जात आहे. 7 ते 14 जून दरम्यान इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर (Oval Stadium) हा सामना खेळवला जाणार आहे. पण हा सामना इंग्लंडमध्येच का खेळवला जातोय असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडलाय. 

| Jun 07, 2023, 19:17 PM IST
1/5

भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळवला जात आहे. इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर खेळवल्या जाणाऱ्या या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकत पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी टीम इंडिया चार वेगवान गोलंदाज घेऊन मैदानात उतरलीय.

2/5

भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यानचा हा सामना इंग्लडच्या ओव्हल मैदनावर खेळवला जातोय. याआधी भारत आणि न्यूझीलंड दरम्यानचा WTC अंतिम सामना 2021 मध्ये इंग्लंड लॉर्ड्स क्रिकेट स्टेडिअमवर खेळवण्यात आला होता. हा सामना जिंकत न्यूझीलंडने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा खिताब जिंकला होता. 

3/5

इंग्लंडच्या वातावरणात भारतीय संघाच्या तुलनेत ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या संघाला अधिका फायदा मिळतो. अशात सलग दुसऱ्यावेळी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना इंग्लंडमध्ये आयोजित करण्यात आला आहे. याबाबत आता मोठं कारण समोर आलं आहे. हा केवळ योगायोग नाही तर यामागे पूर्ण योजना तयार करण्यात आली आहे. 

4/5

आयसीसीकडून WTC चा अंतिम सामना जून महिन्यात खेळवण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. जून महिन्यात भारत, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया किंवा दक्षिण आफ्रिकेत सामना खेळवू शकत नाही याचं सर्वात मोटं कारण म्हणजे या देशांमधलं वातावरण. जून महिन्याता या देशांमध्ये पावसाचा हंगाम असतो किंवा भरपूर ऊन असतं.

5/5

पण जून महिन्यात इंग्लंड महिन्यात वातावरण एकमद स्वच्छ असतं. इंग्लंडमध्ये मे ते सप्टेंबर महिन्यापर्यंत उन्हाळ्याचे दिवस असतात. या काळात मोठ्या प्रमाणावर पर्यटकही इंग्लंडमध्ये फिरण्यासाठी येतात. याचा फायदा क्रिकेट सामन्यांनाही होतो अनेक पर्यटक सामना पाहण्यासाठी उपस्थित राहातात. डब्ल्यूटीसी फायनल सामना इंग्लंडमध्ये आयोजित करण्याचं हे कारण आहे.