Hiccups treatment: उचकी वारंवार लागतेय? आयुर्वेदाच्या या टिप्स फॉलो करा, तुम्हाला क्षणात मिळेल आराम

 Hiccups Problem: उचकी ही एक सामान्य समस्या आहे, म्हणून ती अनेक कारणांमुळे येते. जरी उचकी ही फार मोठी समस्या नसली तरी काही लोकांना खूपच उचकी लागते. 

Sep 22, 2022, 15:30 PM IST

Hiccups Problem:  तुम्ही मोठ्या माणसांचे म्हणणे ऐकले असेल की, एखाद्याची आठवण आली की उचकी येते किंवा लागते. परंतु यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. उचकी ही एक सामान्य समस्या आहे, म्हणून ती अनेक कारणांमुळे येते. जरी उचकी ही फार मोठी समस्या नसली तरी काही लोकांना खूपच उचकी लागते. सहसा हे लोक पाणी पिऊन ती कमी करण्याचा प्रयत्न करतात, परंतु तरीही उचकीपासून आराम मिळत नाही. वैद्यक शास्त्रानुसार डायाफ्राम आणि बरगड्यांच्यामध्ये असलेल्या आंतरकोस्टल स्नायूंचे अचानक आकुंचन होते तेव्हा उचकीचा आवाज येतो. आयुर्वेद डॉ. नितिका कोहली यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर उचकी थांबवण्याचे आयुर्वेदिक उपाय सांगितले आहेत. त्यांच्याबद्दल जाणून घेऊया.

1/6

जर तुम्ही काहीही न खाता किंवा न पिता उचकी थांबवू शकता. यासाठी एक चमचा काळी मिरी पावडर घ्या. आता हळू हळू वास घ्या. लक्षात ठेवा की तुम्हाला शिंक येईपर्यंत हे करावे लागेल. शिंकल्यानंतर उचकी कमी होते.

2/6

उचकी थांबवण्यासाठी दही हा आणखी एक उत्तम उपाय आहे. यासाठी तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही, उचकी आल्यावर एक चमचा दही खा. दही आरोग्यासाठीही उत्तम आहे.

3/6

आयुर्वेदानुसार, उचकीपासून लवकर आराम मिळवण्यासाठी तुम्ही आल्याची मदत घेऊ शकता. यासाठी आल्याचा तुकडा घ्या आणि हळूहळू चावून खा. यामुळे उचकी येणे लगेच थांबेल. आलं खाल्याने उचकी व्यतिरिक्त अनेक समस्यांपासून देखील आराम मिळू शकतो.

4/6

उचकी थांबवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे पाणी पिणे. जेव्हा जेव्हा उचकी येते तेव्हा एक ग्लास पाणी प्या. यामुळे उचकी शांत होईल. पाणी प्यायल्यानंतरही जर उचकी येत असतील तर पाण्याने गार्गल करावे.

5/6

उचकी थांबवण्यासाठीही साखर गुणकारी आहे. जर तुमची उचकी थांबत नसेल तर एक चमचा साखर घ्या आणि हळू हळू चावा. साखरेच्या गोडव्यामुळे तुम्हाला थोड्याच वेळात हिचकीपासून आराम मिळेल.

6/6

        View this post on Instagram                       A post shared by Dr Nitika Kohli, Ayurveda (@drnitikakohli) उचकी थांबवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे पाणी पिणे. जेव्हा जेव्हा उचकी येते तेव्हा एक ग्लास पाणी प्या. यामुळे उचकी शांत होईल. पाणी प्यायल्यानंतरही जर उचकी येत असतील तर पाण्याने गार्गल करावे.