'निसर्गा'मुळे होत्याचं नव्हतं झालं
निसर्ग चक्रीवादळामुळे मोठं नुकसान
निसर्ग चक्रीवादळामुळे अनेक जिल्ह्यांचे मोठे नुकसान झाले होते. निसर्ग चक्रीवादळामुळे अनेक झाडे उन्मळून पडली, घरांची कौलं आणि पत्रे जोरदार वाऱ्यामुळे उडून गेले गावऱ्यांचे जीवन १० ते १५ वर्ष मागे गेले आहे. या चक्रीवादळामुळे दापोली, असूड आणि मुरूड यांसारख्या अनेक गावांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी रायगड जिल्ह्यातील वादळग्रस्त भागाचा दौरा केला. यावेळी नुकसान झालेल्या रायगड जिल्ह्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीची मदत म्हणून १०० कोटी रुपये जाहीर केले आहेत. ही सुरुवात आहे. त्याला पॅकेज म्हणू नका, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांना सांगितले.