R Ashwin: सामन्याच्या चौथ्या दिवशी रविचंद्रन अश्विनचं कमबॅक, BCCI कडून मोठी बातमी

R Ashwin: राजकोट टेस्टच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाला मोठा धक्का बसला. भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज फिरकीपटू आर अश्विन सामना अर्धवट सोडून घरी परतला. 

| Feb 18, 2024, 11:01 AM IST
1/7

इंग्लंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या टेस्ट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी अचानक अश्विनने वैयक्तिक कारणांमुळे सामन्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. 

2/7

मात्र आता राजकोट टेस्टच्या चौथ्या दिवशी रविचंद्रन अश्विन टीम इंडियात सामील होणार असल्याची माहिती मिळतेय. 

3/7

बीसीसीआयने अश्विनबाबत एक महत्त्वाची माहिती दिलीये. सामन्याच्या दुसऱ्या दिवसानंतर अश्विनने सामन्यातून आपलं नाव तात्पुरतं मागे घेतलंय.

4/7

बीसीसीआयने सांगितलं की, अश्विन आणि टीम मॅनेजमेंटने पुष्टी केली असून चौथ्या दिवशी कमॅबर करेल.

5/7

बीसीसीआयने पुढे म्हणालं की, टीम मॅनेजमेंट, खेळाडू, मीडिया आणि चाहत्यांनी कुटुंबाचं महत्त्व प्राधान्याने स्वीकारून खूप समज आणि सहानुभूती दाखवली. या कठीण काळात अश्विनच्या पाठिंब्यासाठी टीम आणि त्याचे समर्थक एकजूट राहिले आहेत.

6/7

अश्विनने राजकोट टेस्टच्या दुसऱ्या दिवशी 500 टेस्ट विकेट्स बळी पूर्ण केले होते, त्यानंतरच त्याला कौटुंबिक कारणामुळे घरी रवाना व्हावं लागलं होतं.  

7/7

त्यामुळे इंग्लंडच्या दुसऱ्या डावात अश्विनच्या फिरकीची जादू पुन्हा दिसून येणार आहे.