Palmistry: हातावर 'अशी' रेखा असेल तर, चाळीशीनंतर उजळेल तुमचं भाग्य

नशीब हे हातांच्या रेषांवर आधारलेलं असतं, असं कायम सांगितलं जातं.   

Updated: Aug 13, 2022, 08:12 AM IST
Palmistry: हातावर 'अशी' रेखा असेल तर, चाळीशीनंतर उजळेल तुमचं भाग्य  title=

मुंबई  : नशीब हे हातांच्या रेषांवर आधारलेलं असतं, असं कायम सांगितलं जातं. आपल्या नशीबात भरभरून यश यावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. हस्तरेषा शास्त्रानुसार हाताच्या रेषा आणि खुणांवरून व्यक्तीचा भूतकाळ, भविष्य आणि त्याच्या स्वभावाविषयी कळतं. तळहातावरच्या रेषा करिअर, वैवाहिक जीवन, आर्थिक स्थिती यांबद्दल सुचना देतात. जर तुमच्या तळहातावर 'H' ही रेखा असेल तर, वयाच्या चाळीशीनंतर तुमचं भाग्य उजळेल. 

तळहातातील 'H' ही रेषा अतिशय शुभ मानली जाते. हस्तरेषा शास्त्रानुसार हृदय, भाग्य आणि मस्तक या तीन रेषांनी H चे चिन्ह तयार झाले असेल तर वयाच्या 40 वर्षांनंतर व्यक्तीचे नशीब चमकू लागेल. अशा लोकांना प्रत्येक गोष्टीत यश मिळते.

जर एखाद्या व्यक्तीच्या तळहातावर 'H' ही रेषा असेल तर त्याची आर्थिक स्थिती चांगली असते. या लोकांना वयाच्या चाळीशी आधी थोडे कष्ट करावे लागतील. पण 40 नंतर त्याच्या आयुष्यात अनेक आनंददायी क्षण येतात. 

पण 'या' व्यक्तींनी सतर्क राहण्याची गरज 
ज्या व्यक्तींच्या तळहातावर 'H' अशी रेषा तयार होत असेल, तर त्यांनी आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर सतर्क राहण्याची गरज आहे. कारण या व्यक्ती स्वभावाने साधे असतात, त्यामुळे त्यांची फसवणून होण्याची दाट शक्यता असते. 

(अस्वीकरण: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE मीडिया त्याची पुष्टी करत नाही.)