Vastu Tips : 'या' कारणामुळे गरम तव्यावर पाणी टाकू नये, याचे परिणाम खूप वाईट होऊ शकतात

तुम्हाला माहित आहे का, की वास्तुशास्त्रानुसार तव्याचे असे काही नियम आहे, जे आपल्याला माहित असायला हवे.

Updated: May 4, 2022, 04:33 PM IST
Vastu Tips : 'या' कारणामुळे गरम तव्यावर पाणी टाकू नये, याचे परिणाम खूप वाईट होऊ शकतात title=

मुंबई : असे अनेक लोक आहेत, जे नवीन घर घेताना किंवा जमीन विकत घेताना वास्तुशास्त्र विचारात घेतात. यामध्ये चांगल्या वाईट सगळ्याच गोष्टी आपल्याला माहिती पडतात. ज्यामुळे आपण घरातील वास्तु शांत करण्याचा प्रयत्न करतो, ज्यामुळे घरात सुख, समृद्धी आणि शांती लाभते. वस्तुंची योग्य दिशा सांगण्यासाठी आपल्याला वास्तुशास्त्र मदत करते. इतकेच नाही तर काही महत्त्वाच्या गोष्टींच्या योग्य वापराबाबतही वास्तुशास्त्र मार्गदर्शन करते.

त्यात आणखी एक महत्वाचं आहे ते म्हणजे पोळी बनवण्याचा तवा. प्रत्येक भारतीय घराच्या स्वयंपाकघरात पोळी बनवण्याचा तवा असतो. याला काही जन पॅन देखील म्हणतात. परंतु तुम्हाला माहित आहे का, की वास्तुशास्त्रानुसार तव्याचे असे काही नियम आहे, जे आपल्याला माहित असायला हवे. त्यांपैकी एक आहे तव्यावर पाणी टाकणे.

आपण आपल्या आईला किंवा घरातील मोठ्या माणसांना हे सांगताना ऐकलं असेल की, तव्यावर पाणी टाकू नये. परंतु ते असं का सांगतात? यामागचं कारण आपल्याला माहित नसतं. परंतु वास्तुशास्त्रात याला महत्व आहे. आता वास्तुशास्त्र याबाबत काय सांगतं? जाणून घेऊ या.

गरम तव्यावर पाणी का टाकू नये?

आपल्यापैकी बऱ्याच लोकांना ही सवय असते, तर काही लहान मुलं मज्जा म्हणून गरम तव्यावर पाणी टाकतात. खरंतर गरम तव्यावर पाणी टाकल्याने ते पाणी तडतडू लागतं, जे बऱ्याच लोकांना पाहायला खूप आवडतं. ज्यामुळे ते तव्यावरती पाणी टाकतात. 

परंतु वास्तुशास्त्रानुसार गरम तव्यावर पाणी टाकल्यावर जो आवाज तयार होतो, तो आवाज घरात नकारात्मकता आणतो, यामुळे घरातील सदस्यांना कोणत्याही प्रकारचा आजार उद्भवू शकतो.

गरम तव्यावर पाणी टाकल्याने मुसळधार पाऊस पडतो, असेही मानले जाते. असा पाऊस विध्वंस घडवून आणतो, म्हणून वडीलधारी मंडळी तसे करण्यास नकार देतात.

पाण्याचा संबंध राहूशी असल्याचे मानले जाते. त्यामुळे मोठ्या त्रासाला आपल्याला सामोरं जावं लागू शकतं. वास्तुशास्त्रानुसार, पॅन नेहमी स्वयंपाकघरात अशा ठिकाणी ठेवावा, जिथून बाहेरच्या व्यक्तीला ते दिसले नाही पाहिजे.

- तवा नेहमी खाली आडवा ठेवावा. त्याला उभे ठेवणे योग्य नाही.

-तवा कधीही घाण ठेवू नका. तो वापरल्यानंतर नेहमी स्वच्छ ठेवा. नाहीतर घरात गरीबी निर्माण होते.

- जेव्हा तुम्ही पोळी बनवायला सुरुवात कराल, तेव्हा तव्यावर थोडे मीठ शिंपडा. असे केल्याने घरात कधीही धन आणि अन्नाची कमतरता भासत नाही.

दुसरीकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिल्यास मीठामुळे तवा जंतूमुक्त होतो आणि त्यावर बनवलेल्या रोट्या खाल्ल्याने आजार होत नाहीत.

(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)