भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना आजपासून म्हणजेच 24 ऑक्टोबरपासून पुण्यातील MCA स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना सकाळी 9.30 वाजता सुरू झाला आहे. या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी स्टार ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन हा खेळाडू इतिहास रचण्याच्या जवळ आहे. रविचंद्रन अश्विन ऑस्ट्रेलियाचा महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्नचा 18 वर्ष जुना विक्रम मोडू शकतो. सध्या न्यूझीलंडचा संघ ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० ने पुढे आहे. आता मालिकेत टिकण्यासाठी टीम इंडियाला पुण्यात होणारा दुसरा कसोटी सामना कोणत्याही किंमतीत जिंकावा लागेल.
रविचंद्रन अश्विनने भारताकडून 103 कसोटी सामने खेळताना एकूण 37 वेळा 5 विकेट्स घेतल्या आहेत. शेन वॉर्नने ऑस्ट्रेलियाकडून 145 कसोटी सामने खेळताना एकूण 37 वेळा 5 विकेट्स घेतल्या होत्या. रविचंद्रन अश्विनने न्यूझीलंडविरुद्धच्या पुणे कसोटीच्या पहिल्या डावात 5 विकेट घेतल्यास तो शेन वॉर्नचा 18 वर्ष जुना विक्रम मोडेल. यासह रविचंद्रन अश्विन कसोटी क्रिकेटमध्ये ३८ वेळा ५ बळी घेणारा गोलंदाज बनेल आणि या बाबतीत तो शेन वॉर्नलाही मागे टाकेल.
शेन वॉर्नने 18 वर्षांपूर्वी केला होता विक्रम
शेन वॉर्नने 2006 मध्ये मेलबर्न येथे इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 37 वी 5 विकेट घेतली. या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात शेन वॉर्नने 17.2 षटकात 39 धावांत 5 विकेट्स घेतल्या. शेन वॉर्नने या डावात अँड्र्यू स्ट्रॉस (50), केविन पीटरसन (21), ख्रिस रीड (3), स्टीव्ह हार्मिसन (7) आणि मॉन्टी पानेसर (4) यांना बाद केले होते. ऑस्ट्रेलियाने हा कसोटी सामना एक डाव आणि 99 धावांनी जिंकला. या सामन्यातील सर्वोत्तम कामगिरीसाठी शेन वॉर्नला 'मॅन ऑफ द मॅच' म्हणून निवडण्यात आले. रविचंद्रन अश्विन आता शेन वॉर्नचा कसोटी क्रिकेटमधील विक्रम मोडण्याच्या जवळ आला आहे.
LBW!
R Ashwin strikes in his very first over and gets the opening wicket for #TeamIndia
New Zealand lose Tom Latham's wicket
Live - https://t.co/YVjSnKCtlI#INDvNZ | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/CEYSAziZ3g
— BCCI (@BCCI) October 24, 2024
रविचंद्रन अश्विनने आतापर्यंत भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये 103 कसोटी सामन्यांमध्ये 528 बळी घेतले आहेत. रविचंद्रन अश्विनने आणखी 2 विकेट घेतल्याबरोबरच कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास रचणार आहे. आणखी 2 विकेट्स घेऊन रविचंद्रन अश्विन कसोटी क्रिकेटमध्ये 530 बळींचा टप्पा गाठेल. रविचंद्रन अश्विन हा कसोटी क्रिकेटमध्ये ५३० किंवा त्याहून अधिक बळी घेणारा भारताचा दुसरा गोलंदाज ठरणार आहे. आतापर्यंत केवळ महान लेगस्पिनर अनिल कुंबळेलाच भारतासाठी हा मोठा टप्पा गाठता आला आहे. भारतासाठी, आतापर्यंत केवळ अनुभवी लेगस्पिनर अनिल कुंबळे 600 किंवा त्याहून अधिक कसोटी विकेट घेण्यात यशस्वी ठरला आहे. अनिल कुंबळेने कसोटी क्रिकेटमध्ये 619 विकेट घेतल्या आहेत.
तेजश्री गायकवाड- कदम 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. लोकसत्तामधून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. लोकसत्ताच्या Viva पुरवणीमधून 7 वर्ष विविध विषयांवर लिखाण केले आहे. दैनिक भास्करच्या 'मधुरिमा' मधून फॅशन विषयांवर लिखाण केले आहे. 'झी 24 तास'च्या आधी त्यांनी नवशक्ती (फ्री प्रेस जर्नल), हिंदुस्थान टाइम्स मराठी डिजिटल, लोकसत्ता ऑनलाईन या वृत्तसंस्थेत लिखित बातम्या आणि व्हिडीओ अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये काम केले आहे. 2018 ते 2023 पर्यंत मुंबई आकाशवाणीमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. फॅशन, लाइफस्टाईल, मनोरंजन आणि स्पोर्ट्स या विविध विषयांमध्ये रुची आहे.
...Read More|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 41 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.