भारत वि श्रीलंका पहिली कसोटी: पहिल्या दिवसाचा खेळ थांबवला

भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामन्याला आजपासून कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानावर सुरुवात झालीये. 

Updated: Nov 16, 2017, 04:58 PM IST
भारत वि श्रीलंका पहिली कसोटी: पहिल्या दिवसाचा खेळ थांबवला title=

कोलकाता : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामन्याला आजपासून कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानावर सुरुवात झालीये. 

पावसामुळे पहिल्या दिवशी ११.५ षटकांचा खेळ होऊ शकला. या दरम्यान भारताने तीन विकेट गमावताना १७ धावा केल्या. श्रीलंकेकडून लकमलने तीन विकेट घेतल्या. पावसामुळे टॉसलाच उशिर झाला. श्रीलंकेने टॉस जिंकताना भारताला फलंदाजीचे निमंत्रण दिले. भारताची सुरुवात चांगली झाली नाही. सामन्यात पहिल्याच चेंडूवर लोकेश राहुल खाते न खोलताच बाद झाला. 

राहुल बाद झाल्यानंतर दुसरा सलामीवीक शिखर धवन ८ धावांवर बाद झाला. धवन बाद झाल्यानंतर पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली. 

पाऊस थांबल्यानंतर खेळाला सुरुवात झाली. त्यानंतर कोहली शून्यावर बाद झाला. पाऊस तसेच अंधुक प्रकाशामुळे अखेर खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला. 

संक्षिप्त धावसंख्या - भारत ३ बाद १७