टीम इंडियाच्या 2 बॉलर्सना पाहून पाकिस्तानच्या फलंदाजांना फुटतो घाम

टीम इंडियातील कोणत्या दोन गोलंदाजांना घाबरतात पाकिस्तानचे फलंदाज?

Updated: Jun 3, 2021, 05:37 PM IST
टीम इंडियाच्या 2 बॉलर्सना पाहून पाकिस्तानच्या फलंदाजांना फुटतो घाम title=

मुंबई: भारत विरुद्ध पाकिस्तान सामना म्हटलं की तो फक्त मैदान आणि चाहत्यांपुरता विषय मर्यादित राहात नाही तर देशप्रेमापर्यंत येतो. भारत विरुद्ध पाकिस्तान झालेल्या सामन्यांचे किस्से आजही चाहते विसलेले नाहीत. कराचीमध्ये इरफान पठानची हॅट्रिकतर विसरणं अशक्य गोष्ट आहे. पाकिस्तानचे फलंदाज टीम इंडियाचा दोन गोलंदाजांना मात्र खूप घाबरायचे. हे गोलंदाज समोर आले की क्रिझवरच्या माणसाला घाम फुटायचा यासंदर्भात शोएब मलिकने खुलासा केला आहे. 

शोएबने सांगितलं की, 'जहीर खान आणि आशीष नेहरा यांच्या गोलंदाजीसमोर पाकिस्तानचे फलंदाज लोटांगण घालायचे. ते दोघंही आले की संघातील फलंदाजांना चांगलाच घाम फुटायचा. इरफान पठाणसमोर कधीही एवढं टेन्शन आलं नाही जेवढं या दोन गोलंदाजांसमोर यायाचं.' 

39 वर्षीय पाकिस्तानी फलंदाजाने सांगितले की, 'खरा धोका जहीर खान आणि आशीष नेहराकडून होता. कारण, दोघेही फलंदाजाच्या टोकावर लक्ष्य करायचे. म्हणूनच हे दोन्ही गोलंदाजही इतके यशस्वी झाले. जहीर खान आणि आशीष नेहरा पाकिस्तान विरुद्ध खूप जास्त यशस्वी गोलंदाजी करू शकले. मला जहीर आणि आशीषचा जास्त त्रास झाला नाही कारण मी इनस्विंजर चांगला खेळत असे. त्यामुळे मला त्रासदायक जास्त वाटलं नाही.'

पाकिस्तानचे बरेचसे फलंदाज आशीष नेहरा आणि जहीर खान यांना घाबरून असायचे. या दोघांच्या गोलंदाजीसमोर पाकिस्तानी फलंदाजांची दांडी गुल व्हायची असा खुलासा स्वत: शोएब मलिक याने केला आहे.