टोल विरोधी कृती समिती

टोल वसुलीला विरोध, कोल्हापूर जिल्हा बंद १०० टक्के यशस्वी

आयआरबी कंपनीच्या टोल वसुलीला विरोध करण्यासाठी पुकारण्यात आलेला कोल्हापूर जिल्हा बंद १०० टक्के यशस्वी ठरला असल्ययाचा दावा करण्यात आला आहे. याबाबत कोल्हापुरकरांच्या भावना राज्य सरकारकडे पोहचवू असं आश्वासन जिल्हाधिका-यांनी दिलंय. मात्र टोल विरोधी समिती आपल्या मागण्यांवर ठाम असल्यानं हा प्रश्न आगामी काळातही धुमसत राहण्याची शक्यता आहे.

Oct 18, 2013, 07:47 AM IST

कोल्हापुरात पोलीस बंदोबस्तात टोल वसुलीचा प्रयत्न!

कोल्हापुरात टोलला विरोध असतानाही आयआयरबी कंपनीच्या वतीने नऊ टोल नाक्यांवर पोलीस बंदोबस्तात टोल वसूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलकांनी टोल नाक्यावरील कामगारांना हुसकावत टोल वसुली बंद पाडली.

Oct 17, 2013, 06:00 PM IST