मकरंद अनासपूरे

मुख्यमंत्री हे पाहा, दुष्काळासाठी नाना पाटेकरने काय केलं?

दुष्काळग्रस्तांचा केवळ पोकळ आश्वासन देऊन दिलासा देण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केल्याचे दिसत आहे. त्यांनी दुष्काळग्रस्त भागांचा दौरा केला. यावेळी त्यांनी मदत केली नाही. केवळ पाहणी करुन आश्वासन दिले. मात्र, अभिनेता नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे यांनी आपल्या परीने आर्थिक मदत केली. ते एवढ्यावर न थांबता, 'नाम फाऊंडेशन' स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी साडेसहा कोटी रुपये जमविलेत. हा निधी लवकच दुष्काळग्रस्तांना देण्यात येणार आहे.

Sep 30, 2015, 05:49 PM IST