bmc nivadhanuka

भाजपने देशाला बिनपाण्याची आंघोळ घातली : उद्धव ठाकरे

शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीका करण्याची एकही संधी सोडलेली नाही. संसदेत मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यावर टीका केली होती. हाच धागा पकडत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला चिमटा काढला. काल मोदींनी मनमोहन सिंग यांनी रेनकोट घालून आंघोळ करण्याची कला प्राप्त झाली असं म्हणाले. ते रेनकोट घालून आंघोळ तरी करतात मात्र तुम्ही तर देशाला बिनपाण्याची आंघोळ घातली. केवळ साबणाचे बुडबुडे काढलेत. कारण ते पारदर्शक असतात.  

Feb 9, 2017, 09:19 PM IST