koli

नारळी पौर्णिमेनिमित्त कोळी बांधवांनी समुद्राला नारळ केलं अपर्ण

समुद्राकाठी रहाणा-या आणि प्रामुख्याने मासेमारी करणा-या कोळी लोकांचा महत्त्वाचा सण म्हणजे नारळी पौर्णिमा. गुहागरच्या वेळणेश्वर गावातील कोळी बांधवांनी देखील नारळी पौर्णिमाचा सण उत्साहात साजरा केला. महिलांनी गाणी म्हणत समुद्राला नारळ अपर्ण केला. पूजा केल्यानंतर कोळी महिला किना-यावर फुगड्या घालतात. या सणाला नारळाचे गोड पदार्थ तयार केले जातात.

Aug 7, 2017, 12:16 PM IST