भाजपला महायश

दलितांच्या मतांमुळे भाजपला मिळालं महायश - रामदास आठवले

उत्तर प्रदेशात भाजपने पहिल्यांदा ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयानंतर तर विरोधकांना ही चांगलाच धक्का बसला. विरोधकांनीही पंतप्रधान मोदींचं अभिनंदन केलं. ही मोदी लाट असल्याचं अनेक विरोधकांनी मान्य ही केलं. यावर आता आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. दलित मतदारांनी बहुजन समाज पक्षाला नाकारले. समाजवादी पक्ष, काँग्रेसचाही दारुण पराभव झाला. दलित मतदारांची मते भाजपला मिळाल्याने यश नव्हे तर महायश मिळाले अशी प्रतिक्रिया केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी दिली. 

Mar 12, 2017, 01:29 PM IST