भाजप कार्यकर्त्यांची खरंच अटलजींच्या विचारांवर श्रद्धा आहे का?- नितीन गडकरी

औरंगाबादमध्ये काढण्यात आलेल्या अस्थीकलश यात्रेत संतापजनक प्रकार घडला होता.

Updated: Aug 26, 2018, 09:06 PM IST
भाजप कार्यकर्त्यांची खरंच अटलजींच्या विचारांवर श्रद्धा आहे का?- नितीन गडकरी title=

नागपूर: भाजप कार्यकर्त्यांची खरंच अटलबिहारी वाजपेयी यांच्या विचारांवर श्रद्धा आहे का, असा सवाल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विचारला. ते रविवारी अटल बिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली सभेत बोलत होते. यावेळी गडकरी यांनी भाजप कार्यकर्त्यांचे कान टोचले. 

यावेळी नितीन गडकरी यांनी अटलबिहारी वाजपेयींसोबतच्या आठवणींना उजाळा दिला. चाल, चलन आणि चरित्र्याच्याबाबतीत अटलजींचे विचार आणि त्यांच्या उद्दिष्टांच्या आपण जवळपास आहोत का, याचा विचार भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला पाहिजे, असे त्यांनी म्हटले. 

काही दिवसांपूर्वीच औरंगाबादमध्ये काढण्यात आलेल्या अस्थीकलश यात्रेत संतापजनक प्रकार घडला होता. यावेळी अस्थीकलशाच्या रथावर शहराचे उपमहापौर विजय औताडे फोटोसेशनमध्ये मग्न होते. अनेकांनी विजय औताडेंवर कारवाई करावी, अशी मागणीही केली होती.