आमिर खानच्या मुलाच्या 'महाराज' चित्रपटावर बजरंग दलाचं सावट! पत्र लिहून नोंदवला आक्षेप अन् ठेवली 'ही' मागणी

Aamir Khan's Son Junaid :  आमिर खानचा मुलगा जुनैदच्या 'महाराज' चित्रपटावर बजरंग दलाचं सावट! थेट त्यांनी पत्र पाठवत नोदंवला आक्षेप

दिक्षा पाटील | Updated: Jun 9, 2024, 01:17 PM IST
आमिर खानच्या मुलाच्या 'महाराज' चित्रपटावर बजरंग दलाचं सावट! पत्र लिहून नोंदवला आक्षेप अन् ठेवली 'ही' मागणी title=
(Photo Credit : Social Media)

Aamir Khan's Son Junaid : बॉलिवूड अभिनेता आमिर खान मोठ्या पडद्यावर दिसत नसला तरी त्याचा मुलगा जुनैद 14 जून रोजी ओटीटी  प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे सगळ्यांचं लक्ष त्याकडे लागले आहे. त्यामुळे आता तो किती चांगलं काम करतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. पण त्या आधीच त्याच्यावर संकाटाचं डोंगर आलं आहे. त्याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्या समाजातील एका वर्गाला नाराज केलं असून, त्यावर आक्षेप घेतल्याचं सांगण्यात येत आहे. एका वृत्तानुसार, विश्व हिंदू परिषदेच्या युवा शाखेनं या चित्रपटावर आनंदी नसल्याचं यशराज फिल्म्सला पत्र पाठवून त्यांना असलेली चिंता व्यक्त केली आहे. 

'बॉलीवुड हंगामा' च्या रिपोर्टनुसार, यशराज फिल्म्स आणि नेटफ्लिक्सला विश्व हिंदू परिषदेच्या बजरंग दलानं 'महाराज' ची स्क्रीनिंग मागणी केली आहे. 3 जूनला लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटलं की चित्रपटाचं पोस्टर पाहून त्यांना वाटतं की एका हिंदू धार्मिक नेत्याला नकारात्मक भूमिकेत दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या भावना या दुखावू शकतात आणि ते आणि तो कायदेशीर मार्गही घेऊ शकतो. आणि तो कायदेशीर मार्गही घेऊ शकतात.

हेच कारण आहे की 14 जूनला ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधी या संगढनेला दाखवायला हवा, त्यानंतर ते सांगितली की हा चित्रपट प्रदर्शना योग्य आहे की नाही. गौतम रावरिया (VHP- बजरंग दलच्या कोकण क्षेत्राच्या के को-ऑर्डिनेटर) नं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात ते वेब स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मशी बोलताना दिसत आहेत की जर त्यांना महाराजमध्ये काही आक्षेपार्ह्य वाटलं, ते तर या चित्रपटाला कुठेही प्रदर्शित होऊ देणार नाही. 

हेही वाचा : सलमाननं शाहरुख खानला दिलं 2500 आणि रेशन! काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घ्या...

काही दिवसांपूर्वी या चित्रपटाच्या प्रदर्शनी तारिख लोकांसोबत शेअर केली आहे. यात जयदीप अहलावत देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. यात एक खूप पावर असलेली व्यक्ती आणि एक निडर पत्रकारांमधील लढाई दाखवण्यात आली आहे. 1800 दशकातल्या एका सत्य घटनेवर हा चित्रपट आधारीत आहे. त्या वेळी नक्की काय झालं हे सगळं या चित्रपटातून दाखवण्यात येणार आहे. सिद्धार्थ पी मल्होत्रा या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.