'माझ्यात आणि अभिषेकमध्ये मतभेद', ऐश्वर्यानं जेव्हा दिली कबुली, घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान 'तो' व्हिडीओ व्हायरल

Aishwarya Rai Bachchan and Abhishek Bachchan Argue : ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चां दरम्यान, ऐश्वर्याचा तो व्हिडीओ व्हायरल

दिक्षा पाटील | Updated: Jul 25, 2024, 12:02 PM IST
'माझ्यात आणि अभिषेकमध्ये मतभेद', ऐश्वर्यानं जेव्हा दिली कबुली, घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान 'तो' व्हिडीओ व्हायरल title=
(Photo Credit : Social Media)

Aishwarya Rai Bachchan and Abhishek Bachchan Argue : बॉलिवूडच्या सगळ्यात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक असलेल्या अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचं नाव घेतलं जात होतं. ते दोघं फक्त ऑन स्क्रिन नाही तर ऑफस्क्रिन देखील चांगले दिसतात असं नेहमीच त्यांचे चाहते म्हणत आले आहेत. मात्र, त्यांच्या चाहत्यांना या गोष्टीनं आश्चर्य झालं आहे ती म्हणजे जेव्हा अनंत अंबानी आणि राधिकाच्या लग्नात ते एकत्र नाही तर वेगवेगळे पोहोचले होते. त्यानंतर जेव्हा अभिषेक बच्चननं ग्रे डिव्हॉर्स काय असतो या संबंधीत एक पोस्ट लाइक केली त्यानंतर सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली. तेव्हा पासून चर्चा सुरु आहे की फक्त बच्चन कुटुंब नाही तर अभिषेक आणि ऐश्वर्यामध्ये वाद सुरु असल्याचे म्हटले जाते.  

ऐश्वर्या राय ही नेहमीच तिला जे वाटतं किंवा तिच जे म्हणणं आहे ते स्पष्टपणे मांडताना दिसते. दरम्यान, आता बच्चन कुटुंबासोबत होत असलेले मतभेद आणि अभिषेक बच्चनसोबच विभक्त होण्याच्या चर्चांमध्ये एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत ऐश्वर्या तिच्यातील आणि अभिषेकमध्ये होत असलेल्या मदभेदांविषयी सांगताना दिसते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

सोशल मीडियावर सध्या बच्चन कुटुंब आणि ऐश्वर्या राय यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असल्याचे आपण पाहिले. यात ऐश्वर्या त्या गोष्टीवर बोलताना दिसते की तिच्यात आणि अभिषेकमध्ये मतभेद होतात. फिल्मफेयरशी बोलताना सुरुवातीला ती यावर काही बोलणं टाळत होती... सगळ्यात आधी ऐश्वर्यानं हे सांगणं टाळलं की त्यांच्यातील वाद हे पर्सनल आहेत. नंतर पुढे हसत ऐश्वर्या म्हणाली, 'कोणालाही हे जाणून घ्यायला आवडणार नाही.' 

हेही वाचा : विवाहित आणि 2 मुलांचा बाप असलेल्या अभिनेत्याला डेट करते साई पल्लवी?

पण जसं पुढे पुढे ऐश्वर्या बोलते त्यावेळी तिनं त्यांच्यात येणाऱ्या काही आव्हानांबद्दल खुलासा केला आहे. ती म्हणाली की 'आम्ही दोघांमध्ये खूप मजबूत विचारशील व्यक्तिमत्त्व आहे आणि आम्ही अजूनही वाद आणि चर्चा यांच्यातील अंतर शिकतोय. पुढे ऐश्वर्या म्हणाली, आमच्या रक्तात ते आहे. चर्चा करणं आणि वाद करणं यात छोटीशी लाइन असते आणि आम्ही अजूनही ती लाइन काय आहे ते शोधत आहोत. त्यामुळे आम्ही खूप चर्चा करतो. विनम्रतेपणे सांगायचे झाले तर त्याला मतभेद किंवा वाद म्हणता येईल पण...' 2007 मध्ये ऐश्वर्या आणि अभिषेक लग्न बंधनात अडकले. खरंतर कोणत्याही जोडप्याप्रमाणे त्यांच्यात मदभेद होणं ही सामान्य गोष्ट आहे.