'मी तरी कुठे व्हर्जिन आहे'; त्या प्रश्नावर नेहा भडकली

हा काही मोठा विषय नाही 

Updated: Jan 10, 2020, 11:55 AM IST
'मी तरी कुठे व्हर्जिन आहे'; त्या प्रश्नावर नेहा भडकली  title=

मुंबई : अभिनेत्री नेहा पेंडसे 5 जानेवारी 2020 रोजी व्यावसायिक शार्दुल सिंह बयाससोबत मराठमोळ्या पद्धतीने पुण्यात लग्नबंधनात अडकली. लग्न होऊन अवघे चार दिवसच झाले आहेत. पण सोशल मीडियावर नेटकरी नेहाच्या लग्नाबद्दल वेगवेगळे प्रश्न विचारत आहेत. दोनवेळा घटस्फोट घेतलेल्या शार्दुलसोबत नेहाने का लग्न केलं? असा सवाल विचारला जात आहे. 

व्यावसायिक शार्दुल सिंह बयास याचा दोनवेळा घटस्फोट झाला असून त्याला दोन मुलं आहेत. या व्यक्तीशी नेहाने लग्न का केलं असा प्रश्न तिला एका मुलाखतीत विचारण्यात आला? यावर नेहा म्हणते की,'मला कळतं नाही, यामध्ये कोणती मोठी गोष्ट आहे. आपल्यापैकी अनेकजण खूप उशिरा लग्न करतात. त्याला अनेक कारणं देखील आहेत. 'करिअर' हे यातील एक महत्वाचं कारण आहे.'

पुढे नेहा म्हणते की,'लग्न करण्यापूर्वी काहीजण एकापेक्षा अनेकांसोबतच आपलं प्रेमाचं नातं संपवतात. यामध्ये फरक एवढाच की यामध्ये कोणती कायदेशीर गोष्ट नसते.' एवढ्यावरच नेहा थांबली नाही. तर ती पुढे प्रतिप्रश्न विचारते की,'का लोकं शार्दूलच्या लग्नाबद्दल आणि घटस्फोटाबद्दल एवढी चर्चा करतात? मी तरी कुठे व्हर्जिन आहे.'

नवऱ्याची बाजू घेत नेहा म्हणते की,'शार्दूल माझ्या जीवनातल्या पुरुषांपेक्षा कमिटमेंट्स-फोबिक नाही. लग्नापर्यंत नातं पोहोचल्यावर अनेकांनी माघार घेतली'. नेहा म्हणते की, ती तिच्या नवऱ्याला सल्युट करते. त्याला अजूनही लग्नव्यवस्थेवर विश्वास आहे. दोन व्यक्तींकडून लग्नासारख्या गोष्टीत अपयश मिळाल्यानंतरही शार्दुलचा लग्नसंस्थेवर विश्वास कायम ठेवणं काही सोपं नाही. यावरुन कळतं की त्या व्यक्तीला लग्नाचं किती महत्त्व आहे. लग्न करण्यापासून घाबरणाऱ्यांपैकी तो नाही. एखाद्याचं वैवाहिक आयुष्य चांगलं चालत नसेल तर त्याने ते नातं ढकलत पुढे नेण्यापेक्षा तिथेच पूर्णविराम द्यावा, या मताची मी आहे, असं नेहा सांगते.