या मालिकेमधून मयुरी वाघ करणार 'झी' वर पुनरागमन

 'लव्ह लग्न लोचा’या झी युवा वरील मालिकेमध्ये सध्या खूपच धमाल मस्ती सुरूआहे.

Updated: Sep 12, 2017, 05:18 PM IST
या मालिकेमधून मयुरी वाघ करणार 'झी' वर पुनरागमन  title=

 मुंबई :  'लव्ह लग्न लोचा’या झी युवा वरील मालिकेमध्ये सध्या खूपच धमाल मस्ती सुरूआहे.

एकीकडे आकांक्षा आणि श्रीकांत यांच्या लग्नाचा घोळ,  विनय आणि गँगची धमाल, अभिमान आणि शाल्मलीच्या आयुष्यात नव्या बाळाची चाहूल, राघव आणि काव्याचे प्रेम प्रकरण यामुळे ट्विस्ट येत आहेत. तर दुसरीकडे  सुमित आणि सौम्याच्या एक्झिट नंतर त्यांच्या जागी आता कोण येणार याबाबत उत्सुकता आहे. 

  ‘लव्ह लग्न लोचा’आता नव्या पात्राची एण्ट्री होणार आहे. ऋतू असे या पात्राचे नाव आहे. अभिनेत्री मयुरी वाघ ही नवी भूमिका साकारणार आहे. 'अस्मिता' म्हणून घराघरात पोहचलेली मयुरी आता या नव्या भूमिकेतून आपल्यासमोर येणार आहे.

   ऋतू हे पात्र स्मार्ट आणि मॉडर्न मुलीचं आहे. ऋतूच्या आयुष्यात तिचं स्वतःच करिअर सगळ्यात महत्वाचं असून तिला लग्न करण्याची इच्छा नाही. सध्या ‘लव्ह लग्न लोचा’मध्ये काव्या ही सगळ्यात बिनधास्त व्यक्तिरेखा आहे पण, ऋतू ही तिच्यापेक्षा जास्त बिनधास्त असेल. ऋतू ही लेखिका असून, ती वृत्तपत्र आणि मासिकांसाठी प्रेम, नातेसंबंध या विषयांवर लेख लिहीत असते. मात्र, यामधील कोणत्याही प्रकारची भावना आजपर्यंत तिने अनुभवलेली नाही. आता ही ऋतू ‘लव्ह लग्न लोचा’च्या टीममध्ये आपली जागा कशी निर्माण करते हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.