घटस्फोटावेळी रितेशने राखीसोबत जे केलं, घडलेला प्रकार सांगताना ती ढसा-ढसा रडली

त्यामुळे माझ्या आयुष्यातील सर्व काही संपलं आहे, असं मला वाटू लागलं आहे.

Updated: Feb 15, 2022, 05:04 PM IST
 घटस्फोटावेळी रितेशने राखीसोबत जे केलं, घडलेला प्रकार सांगताना ती ढसा-ढसा रडली title=

मुंबई : व्हॅलेंटाईन डेच्या एक दिवस आधी राखी सावंतने पती रितेशपासून वेगळं झाल्याचं जाहीर केलं, राखीच्या या निर्णयामुळे सगळेच आश्चर्यचकित झाले होते. राखीने सोशल मीडियावर एक लांबलचक चिठ्ठी लिहून रितेशसोबतचे लग्न मोडणार असल्याचे सांगितले होते.

आता एका मुलाखतीत राखीने याबाबत बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत.राखी एका मुलाखतीत रडत रडत म्हणाली, "तो मला सोडून निघून गेला. मी त्याच्यावर खूप प्रेम केले आणि तो मला सोडून गेला. बिग बॉस नंतर आम्ही मुंबईत माझ्या घरी एकत्र राहत होतो पण एके दिवशी रितेश अचानक बॅग पॅक करून निघून गेला. " 

पुढे राखी म्हणाली, "त्याने आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट न दिल्याने आणि आता त्याला माझ्यासोबत राहायचे नाही म्हणून तो काही कायदेशीर अडचणीत असल्याचे त्याने सांगितले. तसेच व्यवसायात आपले मोठे नुकसान झाले असून खूप पैसे बुडाले असल्याचेही तो म्हणाला. "

राखीने सांगितले की, "बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर जेव्हा मला समजले की तो विवाहीत आहे. त्याला मूल आहे, तेव्हा माझी हर्ट झाले. मी कोणत्याही स्त्री किंवा मुलावर अन्याय करू शकत नाही. तो मला सोडून गेला आहे आणि त्यामुळे माझ्या आयुष्यातील सर्व काही संपलं आहे, असं मला वाटू लागलं आहे."