'मी गौरी साकारली म्हणून...', तृतीयपंथी म्हणत हिणवलं जाण्यावर सुष्मिता सेनचा पारा चढला

Sushmita Sen : सुष्मिता सेननं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या 'ताली' या चित्रपटामुळे ट्रोल होण्यावर वक्तव्य केलं आहे. सुष्मिताची ही सीरिज तृतीयपंथी गौरी सावंतच्या आयुष्यावर आधारीत आहे. तिची ही सीरिज 15 ऑगस्ट रोजी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Aug 7, 2023, 10:54 AM IST
'मी गौरी साकारली म्हणून...', तृतीयपंथी म्हणत हिणवलं जाण्यावर सुष्मिता सेनचा पारा चढला title=
(Photo Credit : Social Media)

Sushmita Sen : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन ही गेल्या अनेक दिवसांपासून ओटीटी प्रोजेक्ट्समुळे चर्चेत आहे. त्यात तिची आर्या या सीरिजचा पुढचा भाग लवकरच प्रेषकांच्या भेटीला येणार आहे. चाहते या सीरिजच्या प्रतिक्षेत आहे. तिसऱ्या सीजनची प्रतिक्षा करत असताना आता सुष्मिता तिच्या ताली या सीरिजमुळे चर्चेत आहे. ही सीरिज 15 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. त्या वेब सीरिजमध्ये सुष्मिता सेन ही गौरी सावंत यांच्या भूमिकेत दिसणार आहे. गौरी सावंत तृतियपंथी असून तिचं आयुष्य किती खडतर होतं हे यात पाहायला मिळत आहे. दरम्यान, या सीरिजच्या प्रमोशनसाठी दिलेल्या मुलाखतीत सुष्मितानं यावरून ट्रोल करणाऱ्या ट्रोल्सला सरळ ब्लॉक केल्याचे म्हटले आहे. 

सुष्मितानं नुकतीच 'न्यूज 18' ला नुकतीच मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तालीवर मिळालेल्या नकारात्मक प्रतिक्रियांवर बोलली आहे. सुष्मिता म्हणाली की काही लोकांच्या प्रोफाइलवर नाव देखील नाही आहे. ते लोक तालीच्या पोस्टवर कमेंट करत छक्का असं म्हणतं आहेत. या गोष्टी सुष्मिताच्या मनाला लागल्या कारण त्या सगळ्या तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर सुरु आहेत. त्यामुळे तिनं अशा सगळ्या कमेंट करणाऱ्या सगळ्यांना ब्लॉक केले आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

याविषयी पुढे बोलत सुष्मिता म्हणाली की गौरी सावंतची भूमिका साकारल्यामुळे तिला खऱ्या आयुष्यात असं काही सहन करावा लागत आहे, हे ती सहन करू शकत नाही. तर स्वत: गौरीला खऱ्या आयुष्यात कित त्रास सहन करावा लागत असेल. इतकं वर्षे ती या सगळ्या गोष्टी सहन करत आयुष्य जगते.

हेही वाचा : आईमुळे 2 वेळा शबाना आझमी यांनी केला होता स्वत: ला संपवण्याचा प्रयत्न, 'या' गोष्टीचा आला होता राग

सुष्मिता सेनच्या ट्रोलिंग विषयी बोलायचे झाले तर हे पहिल्यांदा नाही जेव्हा तिनं ट्रोलिंगचा सामना केला आहे. जेव्हा ललित मोदी यांच्या रिलेशनशिपविषयी चर्चा सुरु झाली होती. तेव्हा लोकांना खूप काही म्हटलं होतं. अनेकांनी तिला गोल्ड डिगर असे देखील म्हटले. याविषयी देखील नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सुष्मितानं वक्तव्य केलं आहे. सुष्मितानं झूमला ही मुलाखत दिली होती. या मुलाखतीत सुष्मिता म्हणाली की 'आपलं नाव तेव्हाच खराब होते जेव्हा आपण ते स्वत: ला लावून घेतो. मी असं काही स्वत: ला लावून घेतलं नाही. तर हे सगळं मला कधी लागलंच नाही. अशा अनेक गोष्टी असतात, ज्याचा कशाशीच संबंध नसतो. मी सध्या सिंगल आहे आणि याविषयी कोणाला काही वाटायला नको.'