''मला कोणत्याही पुरुषाची गरज नाही...'' म्हणत अभिनेत्रीनं केलं असं काही, आता सर्वत्र ठरली चर्चेचा विषय

बदलत्या काळानुसार लग्न आणि नात्याबाबत लोकांची विचारसरणीही बदलत चालली आहे. आधुनिक जगात, अनेक मुली त्यांचे जीवन एकट्याने आणि आपल्या मर्जीने जगणं पसंत करतात.

Updated: Aug 17, 2022, 08:41 PM IST
''मला कोणत्याही पुरुषाची गरज नाही...'' म्हणत अभिनेत्रीनं केलं असं काही, आता सर्वत्र ठरली चर्चेचा विषय title=

मुंबई : बदलत्या काळानुसार लग्न आणि नात्याबाबत लोकांची विचारसरणीही बदलत चालली आहे. आधुनिक जगात, अनेक मुली त्यांचे जीवन एकट्याने आणि आपल्या मर्जीने जगणं पसंत करतात. त्यात असे अनेक लोक आहेत, जे सेलिब्रिटींकडे एक प्रेरणा म्हणून पाहातात आणि त्यांना फॉलो देखील करतात. तसेच लोकांकडे उदाहरण म्हणून पाहातात. परंतु सध्या एक अभिनेत्रीनं असं काहीतरी केलं आहे. जे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन देखील सरकेल.

टीव्ही शो 'दिया और बाती हम' फेम अभिनेत्रीने सर्वांसमोर एक असं वक्तव्य केलं आणि अलं पाऊल उचललं की, तुमचा देखील तिच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलू शकतो.

टीव्ही अभिनेत्री कनिष्का सोनीने स्वतःशी लग्न केलं आहे. हे ऐकुन तुम्हाला धक्का बसला असला, तरी हे खरं आहे.

कनिष्का सोनीने नुकतेच तिचे खास फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती सिंदूर परिधान करताना आणि गळ्यात मंगळसूत्र घातलेली दिसली. कनिष्क सोनीची हे फोटो पाहून तिचे सर्व चाहते आश्चर्यचकित झाले. तिचे फोटो पोस्ट करत कनिष्काने अशी कॅप्शनही लिहिली आहे, जी वाचून लोकांची तारांबळ उडाली. अभिनेत्रीने सांगितले की तिने स्वतःशी लग्न केले आहे.

होय, मंगळसूत्रातील तिचे फोटो शेअर करताना अभिनेत्रीने लिहिले - '' मी स्वतः लग्न केले आहे. मी माझी सर्व स्वप्ने स्वतः पूर्ण केली आहेत आणि मी ज्याच्यावर प्रेम करतो ती एकमेव व्यक्ती मी स्वत: आहे. मला माझ्या इच्छा पूर्णकरण्यासाठी किंवा कशासाठीही पुरुषाची गरज नाही. एकटे राहण्यात नेहमीच आनंदी असतो. मी देवी आहे, मी बलवान आणि सामर्थ्यवान आहे. शिव आणि शक्ती माझ्या आत आहेत धन्यवाद!''

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अभिनेत्रीच्या फोटोंवर चाहतेही प्रतिक्रिया देत आहेत आणि तिच्या निर्णयाला धाडसी म्हणत आहेत. तर काही लोक याबाबत तिला ट्रोल देखील करत आहेत. परंतु कनिष्क सोनीने जे काही केलं ते पाहाता तिने एक धाडसी पाऊल उचलले आहे असेच म्हणावे लागेल.

यापूर्वी देखील काही दिवसांपूर्वी भारतातील एका तरुणीने स्वत:शी लग्न केलं, ज्यामुळे ती चर्चेचा विषय बनली. आता अभिनेत्रीनं देखील सोशल मीडियावर असं पोस्ट केल्यामुळे सर्वत्र चर्चेचा विषय ठरले आहेत.