टीव्ही अभिनेता कुशल टंडनला मुसळधार पावसाचा मोठा फटका, फोटो शेअर करत म्हणाला...

मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे टीव्ही स्टार कुशल टंडनच्या रेस्टॉरंटचं प्रचंड नुकसान झालं आहे.

Updated: Jul 23, 2021, 05:09 PM IST
टीव्ही अभिनेता कुशल टंडनला मुसळधार पावसाचा मोठा फटका, फोटो शेअर करत म्हणाला...  title=

मुंबई : मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे टीव्ही स्टार कुशल टंडनच्या रेस्टॉरंटचं प्रचंड नुकसान झालं आहे. 2019 मध्ये त्यांने सर्वसामान्यांसाठी रेस्टॉरंट ओपन केलं होतं. हार्दिक पांड्या, सोहेल खान, इलिया वंतूर आणि अल्विरा खान यांच्यासह अनेक सेलेब्स रेस्टॉरंटच्या उद्घाटनासाठी हजर होते. कुशल टंडन म्हणाला की, जोरदार होणाऱ्या वाऱ्यामुळे रेस्टॉरंटचं मोठं नुकसान झालं आहे.

कुशल टंडनने सांगितलं की, गार्डने त्याच्या रेस्टॉरंटचा व्हिडिओ पाठविला होता. सुमारे 20 ते 25 लाख रुपयांचे नुकसान झालं आहे. दुर्दैवाने, त्याच्याकडे यासाठी विमा संरक्षण देखील नाही आहे.

कुशल टंडनने आपल्या तुटलेल्या रेस्टॉरंटचे फोटो आपल्या इंस्टा स्टोरीमध्ये शेअर केले आहेत. त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, "माझ्या रेस्टॉरंटची अशी हालत केल्याबद्दल धन्यवाद मुंबईचा पाऊस. परंतु या दुर्घटनेत एक गोष्ट चांगली झाली आहे की, वॉचमेन आणि गार्डपैकी कोणालाही दुखापत झाली नाही."

कुशल टंडनचं वर्कफ्रंट
जर आपण कुशल टंडनच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो 'बेहद' या मालिकेमध्ये दिसला आहे. यामध्ये तो मुख्य भूमिकेत होता, मात्र सध्या तो टीव्ही क्षेत्रापासून दूर आहे आणि वेब सीरिजवर लक्ष केंद्रित करत आहे. कुशल टंडन आणि गौहर खान बिग बॉस 7च्या घरात एकमेकांना डेट करायला लागले होते. पण काही काळानंतर त्यांचं ब्रेकअप झालं आणि सध्या दोघंही चांगले मित्र आहेत.