घटस्फोटानंतर समंथानं का नाकारली 200 कोटी रुपयांची पोटगी?

अनेक दिवसांपासून त्यांच्या नात्यात आलेल्या दुराव्याबाबतच्या कैक चर्चा झाल्या होत्या

Updated: Oct 6, 2021, 07:10 AM IST
घटस्फोटानंतर समंथानं का नाकारली 200 कोटी रुपयांची पोटगी?  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आणि अभिनेता नाग चैतन्य यांनी 4 वर्षांच्या वैवाहिक नात्यातून विभक्त होण्याच्या निर्णय़ाची अखेर अधिकृत घोषणा केली. मागील अनेक दिवसांपासून त्यांच्या नात्यात आलेल्या दुराव्याबाबतच्या कैक चर्चा झाल्या होत्या. पण, खुद्द समंथा आणि नाग चैतन्य या दोघांकडूनही त्यांच्या नात्याबाबत कोणतंही अधिकृत वक्तव्य केलं जात नव्हतं. (Samantha ruth prabhu -refused-offer-of-200-crore after divorce)

अखेर सोशल मीडियाच्या माध्यमातून या दोघांनीही आपण पती- पत्नी म्हणून विभक्त होत असल्याची घोषणा केली. आपल्या नात्याचा पाया ही दशकभराहून अधिक काळापासून असणारी मैत्री होती. पण, आता मात्र नात्यांची समीरकरणं बदलली असल्याचं त्यांच्या पोस्टच्या माध्यमातून लक्षात आलं.

समंथा आणि नाग चैतन्य यांच्या नात्यात आलेल्या दुराव्याची घोषणा झाल्यानंतर समंथाला अक्किनेनी कुटुंबाकडून 200 कोटी रुपये इतकी पोटगी दिली जाणार असल्याचं सांगण्यात आलं. पण, सूत्रांच्या माहितीनुसार समंथानं ही पोटगीची रक्कम नाकारली. समंथा इतकी मोठी रक्कम नाकारण्यामागे तसं कारणंही असल्याची माहिती समोर आली. ज्यानंतर अनेक चाहत्यांनी तिच्या निर्णयाचं स्वागत केलं.

समंथाच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार नाग चैत्यन्सोबतच्या नात्यातून तिला फक्त प्रेम आणि आपुलकी हवी होती. पण, आता हे नातंच राहिलं नसल्यामुळं या सर्वच गोष्टींची अपेक्षाही ती करु शकत नाही. त्यामुळं नात्यांच्या पुढे पैशाचं काय महत्त्वं, याच भावनेने तिनं 200 कोटी रुपयांची पोटगी नाकारली.