लग्नाच्या 8 वर्षांनंतर राकेश बापट पहिल्या पत्नीपासून का झाला वेगळा?

असे अनेक टीव्ही स्टार्स आहेत जे एकत्र काम करताना एकमेकांच्या जवळ आले. 

Updated: Sep 7, 2021, 02:10 PM IST
 लग्नाच्या 8 वर्षांनंतर राकेश बापट पहिल्या पत्नीपासून का झाला वेगळा? title=

मुंबई : असे अनेक टीव्ही स्टार्स आहेत जे एकत्र काम करताना एकमेकांच्या जवळ आले. त्यांच्या नात्याची सुरुवात प्रेमापासून झाली पण ब्रेकअपसोबत संपली. यापैकी एक आहे टीव्ही अभिनेत्री रिद्धी डोगरा आणि राकेश बापट, रिद्धी आणि राकेशची जोडी चाहत्यांमध्ये खूप पसंत करण्यात आली होती, पण जेव्हा दोघांनीही विभक्त होण्याची घोषणा केली तेव्हा सर्वांना आश्चर्य वाटले.

रिद्धी आणि राकेश यांनी लग्नाच्या 8 वर्षानंतर एकमेकांच्या समंतीने वेगळं होण्याची घोषणा केली होती. जेव्हा दोघांनी त्यांच्या विभक्ततेची माहिती दिली होती, तेव्हा त्यांच्या चाहत्यांना विश्वास बसत नव्हता. 

रिद्धी आणि राकेशची पहिली भेट

दोन्ही स्टार्सनी छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध शो सिरीयल मेरीडा - लेकिन कब तक मध्ये एकत्र काम केले. 2010 मध्ये आलेल्या या शोमध्ये आदित्य आणि प्रिया लीड जोडी म्हणून दोन्ही स्टार्स दिसले होते. तसे, या शोच्या आधीच राकेश आणि रिद्धी एकमेकांना भेटले होते. होय, रिद्धी आणि राकेशची पहिली भेट यशराज फिल्म्सच्या एका टीव्ही मालिकेच्या शूटिंग दरम्यान झाली होती.

रिद्धी आणि राकेश प्रेमाबद्दल सांगितली ही गोष्ट

एका मुलाखतीत रिद्धीने सांगितले होते की, जेव्हा शो मधील आमचा पहिला सीन बेड सीन होता, ज्यावर आम्ही हसलो आणि मग आम्ही खरोखर चांगले मित्र झालो. अभिनेत्रीने सांगितले होते की ते प्रथम चांगले मैत्र झाले आणि नंतर एक दिवस लग्न करण्याचा निर्णय घेतला.

वेगळं होण्याचं कारण...

राकेश आणि रिद्धीने एका संदेशाद्वारे चाहत्यांना त्यांच्या विभक्ततेची माहिती दिली होती, दोघांनीही सांगितले होते की , आम्ही वेगळे होत आहोत. आम्ही हा निर्णय परस्पर आदराने आणि एकमेकांसाठी , आमच्या कुटुंबीयांची काळजी घेऊन घेतला आहे. जरी आपण नेहमीच चांगले मित्र असू. पण आता आम्ही जोडपे म्हणून राहणार नाही.