या कारणामुळे धर्मेंद्र मिना कुमारी यांच्यापासून दुरावले

हिंदी चित्रपटसृष्टीतील ट्रॅजेडी क्वीन मीना कुमारी यांनी आपल्या कारकिर्दीत एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत.

Updated: Jan 13, 2022, 08:57 PM IST
या कारणामुळे धर्मेंद्र मिना कुमारी यांच्यापासून दुरावले title=

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील ट्रॅजेडी क्वीन मीना कुमारी यांनी आपल्या कारकिर्दीत एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. मीना कुमारी एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच एक उत्तम कवयित्री आणि गायिका देखील होत्या. त्यांच्या अभिनयासाठी त्यांना 4 वेळा फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला होता. त्याचबरोबर मीना कुमारी यांनी आपल्या करिअरमध्ये जेवढं नाव कमावलं, तेवढंच त्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत होत्या. एक काळ असा होता की धर्मेंद्रसोबतही त्यांचं नाव खूप चर्चेत होतं.

मीना कुमारी या त्यांच्या काळातील एक अतिशय सुंदर अभिनेत्री होत्या, हे सगळ्यांनाच माहीत आहे. ज्यांच्या सौंदर्यावर लाखो चाहत्यांनी तसेच अनेक सिनेतारकांनाही भुरळ घातली होती. तसं, मीना कुमारी एकटेपणामुळे आयुष्यभर गुदमरत राहिल्या. पण त्यांचं नाव अनेक स्टार्सशी जोडलं गेलं होतं. त्यापैकीच एक धर्मेंद्र होते. आज ते भारतीय हिंदी जगताचे हाईमन असले तरी हा प्रवास त्यांच्यासाठी तितकासा सोपा नव्हता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, धर्मेंद्र यांच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात मीना कुमारी यांनी अनेक निर्माता-दिग्दर्शकांकडे त्यांची शिफारसही केली होती.

धर्मेंद्र आणि मीना कुमारी यांचा 1966 साली आलेला पहिला चित्रपट 'फूल और पत्थर' हा त्या काळातील सर्वात हिट चित्रपट होता. अशा प्रकारे मीना कुमारीला धर्मेंद्र यांना अनेक चित्रपट मिळाले. इथून दोघांच्या अफेअर्सच्या बातम्या येऊ लागल्या. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मीना कुमारी धर्मेंद्रबद्दल खूप सिरीयस होत्या. पण जेव्हा धर्मेंद्र यांना यश मिळू लागलं तेव्हा ते मीना कुमारी यांच्यापासून दुरावले. त्याच वेळी, वर्षांनंतर एका मुलाखतीत धर्मेंद्र यांना विचारण्यात आलं की, 'मीना कुमारी तुमचं पहिलं प्रेम होतं का? यावर त्यांनी 'प्रेम नाही, मी त्यांचा फॅन होतो' असं उत्तर दिलं.