डेंग्यू असा होतो आणि डेंग्यूसाठी प्रतिबंधात्मक उपाय

पावसाळा चालू होताच जागोजागी पाणी तुंबते आणि घाणेरड्या पाण्यामुळे डास आणि मच्छरांची संख्या वाढते.

Updated: Nov 13, 2019, 07:47 AM IST
डेंग्यू असा होतो आणि डेंग्यूसाठी प्रतिबंधात्मक उपाय title=

मुंबई : पावसाळा चालू होताच जागोजागी पाणी तुंबते आणि घाणेरड्या पाण्यामुळे डास आणि मच्छरांची संख्या वाढते. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया सारखे आजार वेगाने पसरतात. मादी एडीस इजिप्ती डासाने चावल्यामुळे डेंग्यूची सुरूवात होते. सुरूवातीला हा ताप सामान्य वाटतो. परंतू वेळवर जर यावर उपचार सुरू केला नाही किंवा चुकीचा उपचार केल्यास डेंग्यू वाढण्याचा धोका असतो.

पावसाळ्यानंतर डेंग्यूचा प्रभाव वाढतो
डेंग्यू, पावसाळ्यात आणि त्याच्या नंतरच्या महिन्यात म्हणजेच जुलै ते ऑक्टोबरमध्ये सगळ्यात जास्त पसरतो. कारण या ऋतूमध्ये डासांची पैदास वाढण्याची शक्यता असते. एडीस इजिप्ती डासाला खूप उंचावर उडता येत नाही आणि डेंग्यूचा मच्छर सकाळी चावतो. चावल्याच्या ३-५ दिवसांनंतर रुग्णांमध्ये डेंग्यूच्या तापाची लक्षणे दिसण्यास सुरवात होते. शरीरात ही बाधा होण्यासाठी मर्यादा ३ ते १० दिवसांची पण असू शकते.

 या गोष्टींवर लक्ष ठेवा
- डेंग्यूचा मच्छर साचलेल्या पाण्यात होतात.
- म्हणुन घरात आणि आजुबाजूच्या परिसरात पाणी साचू देऊ नका.
- कूलरमध्ये असलेले पाणी २ ते ३ दिवसांमध्ये नक्की बदला.
- घराच्या आजूबाजूच्या नाल्यांमध्ये एंटी लार्वाचा फवारा मारा.
- घरात लादी पुसणाऱ्या पाण्यात केरोसिन किंवा फिनायल टाकून लादी पुसा.
- जेव्हा घरातून निघाल, तेव्हा पुर्ण बाह्यांचे कपडे घाला, शॉर्ट्स घालण्याचे टाळा.
- मच्छर गडद रंगाकडे आकर्षित होतात म्हणून फिकट रंगाचे कपडे घाला.
- गडद सुगंधाचे फर्म्यूम टाळा, कारण मच्छर स्ट्रॉन्ग स्मेलकडे आकर्षित होतात
- झोपण्याच्या आधी हात-पाय आणि शरिराच्या उघड्या अंगावर व्हिक्स लावा. त्यामुळे मच्छर जवळ येणार नाहीत
- तुळशीचे तेल, पुदिन्याच्या पानांचा रस, लहसूनचा रस किंवा झेंडूच्या फुलांचा रस शरीरावर लावल्याने मच्छर तुमच्यापासून लांब राहतील