नवरीच्या मैत्रिणींनी केलं असं काही की नवरदेवाने लग्नमांडवातच रडून घातला गोंधळ, लग्नही मोडलं

Bride Broke Wedding: नवरदेवाची मस्करी केलेली सहन न झाल्यामुळं नवरदेव लग्नाचा मांडव सोडून रडत निघून गेल्याचा प्रकार घडला आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 14, 2023, 02:11 PM IST
नवरीच्या मैत्रिणींनी केलं असं काही की नवरदेवाने लग्नमांडवातच रडून घातला गोंधळ, लग्नही मोडलं title=
bridesmaid teasing groom he left marriage venue bride broke wedding

Trending News In Marathi: लग्नघर म्हटलं की चेष्टा-मस्करी, गप्पा, एकमेकांना चिडवणे या साऱ्या गोष्टी आल्याच. लग्न लागत असताना नवरीच्या बहिणी व मैत्रिणी नवरदेवाची चेष्टा करत असतात. तर, नवरदेवही ही चेष्टा गंमतीत घेत असतो. लग्नमांडवात हे खेळी-मेळीचे वातावरण नेहमीच पाहायला मिळते. मात्र, नवरदेवाची चेष्टा केल्यामुळं एक लग्न मोडल्याचे समोर आले आहे. लग्न मोडल्यामुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

बिहार जिल्ह्यातील मिर्झापूरमध्ये ही अजब घटना घडली आहे. 11 जूनरोजी नवरदेव वधुच्या घरी वरात घेऊन गेला होता. वधुच्या कुटुंबीयांनी नवरदेवाचे हसत-हसत स्वागत केले. सिमांतपूजन झाल्यानंतर लग्नाची तयारी सुरू करण्यात आली. नवरदेव आणि नवरीमुलीला स्टेजवर बोलवण्यात आले. दोघांनी एकमेकांना वरमाला घातल्या. त्यानंतर लग्नाचे इतर विधी पूर्ण करण्यासाठी नवरदेवाला मांडवात बोलवण्यात आले. मात्र तिथे घडले भलतेच आणि लग्न मोडले. 

नवरदेवाने रडत-रडत सोडला मांडव

लग्नाच्या मांडवात नवरदेवाच्या मैत्रिणी, बहिणी आणि घर-गावातील इतर महिलांनी नवरदेवाची चेष्टा करण्यास सुरुवात केली. मात्र, नवरदेवाला चेष्टा सहन झाली नाही आणि त्याने रडण्यास सुरुवात केली. नवरदेव रडत-रडत लग्नाचा मांडव सोडून तिथून पळून गेला. नवरदेवाचे हे रूप पाहून नवरीला धक्काच बसला. तिने हे लग्न करणार नसल्याचे जाहीर करुन टाकले. 

नवरी मुलीने लग्न न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सगळ्यांनी तिला समजवण्याचा निर्णय घेतला. मात्र ती तिच्या निर्णयावर ठाम राहिली. तिच्या निर्णयाने सर्वच आश्चर्यचकित झाले. नवरदेवाच्या कुटुंबीयांनी यावर गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तेव्हा नवरीच्या नातेवाईकांनी नवरदेव आणि त्याच्या वडिलांसह इतर नातेनाईकांना बंधक बनवले. हुंड्यात दिलेले सगळे सामान परत देण्यास सांगितले. तेथील परिस्थिती पाहता दोन्ही पक्षाकडील लोकांनी सामंजस्याची भूमिका घेत सर्व वस्तू परत देण्याचा निर्णय घेतला. 

म्हणून तरुणीने मोडलं लग्न

नवरी जेव्हा लग्नासाठी स्टेजवर आली तेव्हा नवरदेवाचे वागणं-बोलणं एकून तिला त्याच्यावर संशय आला. नवरीला वाटले मुलगा गतिमंद असू शकतो. त्यामुळं लग्नाचे इतर विधी होण्याआधी तिने तिच्या मैत्रिणींना नवरदेवाकडे पाठवले. त्यानंतर तिच्या मैत्रिणींनी त्याची चेष्टा-मस्करी करण्यास सुरुवात केली. तेव्हा खरंच नवरदेव मानसिकदृष्टा अस्थिर असल्याचे कळलं. तेव्हा नवरीला आपली फसवणूक झाल्याचे कळताच तिने लग्न मोडलं आहे. शेवटी नवरीला न घेताच वरात पुन्हा परत गेली. या घटनेची परिसरात एकच चर्चा आहे.