Indian Railway : आता ट्रेनच्या गलिच्छ टॉयलेटपासून मिळणार सुटका, रेल्वेने सुरू केली ही सुविधा

सर्वसाधारण किंवा स्लीपर क्लासमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या समस्येचा सर्वाधिक सामना करावा लागतो. परंतु आता असं होणार नाही.

Updated: Jul 3, 2022, 06:45 PM IST
Indian Railway  : आता ट्रेनच्या गलिच्छ टॉयलेटपासून मिळणार सुटका, रेल्वेने सुरू केली ही सुविधा title=

मुंबई : भारतीय रेल्वे जगातील सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्कपैकी एक आहे. भारतीय रेल्वेतून दररोज करोडो प्रवासी प्रवास करतात. रेल्वे देखील आपल्या प्रवाशांना सुविधा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करते. असे असतानाही प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रेल्वेतून प्रवास करणाऱ्या बहुतांश प्रवाशांना अस्वच्छ स्वच्छतागृहांच्या समस्येला सामोरे जावे लागते.

सर्वसाधारण किंवा स्लीपर क्लासमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या समस्येचा सर्वाधिक सामना करावा लागतो. आता ही समस्या सोडवण्यासाठी रेल्वेने नवीन सुविधा सुरू केली आहे. त्यामुळे प्रवाशांचा रेल्वे प्रवास आणखी सुखकर होणार आहे.

भारतीय रेल्वे गाड्यांच्या तपासणीसाठी अधिकारी तैनात करणार आहे. त्यामुळे गाड्यांमधील स्वच्छता, एसी संबंधित समस्या लवकरात लवकर सोडवल्या जातील.

सध्या भारतीय रेल्वेने ही सुविधा प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली आहे. येत्या काळात ही सुविधा सर्व प्रवाशांसाठी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून दिली जाणार आहे.

आता भारतीय रेल्वेने एसी कोचमध्ये ही सुविधा सुरू केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रेल्वेने प्रवाशांसाठी या विशेष सुविधेअंतर्गत अनेक गाड्यांमधील स्वच्छतागृहांची देखभालही सुरू केली आहे. आतापर्यंत जवळपास गाड्यांमध्ये 500 हून अधिक तपासण्या झाल्या आहेत.

जर रेल्वे गाड्यांची तपासणी करण्यासाठी अधिकारी तैनात करणार आहे. यामुळे ट्रेनमध्ये स्वच्छता राखण्यात मदत होईल.

सध्या एसी डब्यांमध्ये अशी सुविधा सुरू करण्यासाठी रेल्वेने पुढाकार घेतला असून त्यानंतर ही सुविधा मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रेल्वेने ही विशेष देखभाल देखील सुरू केली आहे. यापूर्वीच 500 हून अधिक तपासण्या झाल्या आहेत आणि आता मोठ्या प्रमाणावर करण्याची तयारी सुरू आहे.

या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल

मीडिया रिपोर्ट्सनुसार, यासाठी भारतीय रेल्वेचे मोठे अधिकारी तैनात केले जातील. त्यासाठी अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक, भारतीय रेल्वेचे यांत्रिक अभियंता अशा वरिष्ठ अधिकाऱ्यांची ड्युटी लावण्यात येणार आहे.

आतापर्यंत प्रवासी त्यांच्या तक्रारी रेल्वेच्या हेल्पलाइन क्रमांकावर किंवा स्टेशन मास्टरकडे नोंदवत असत. आता यासाठी त्यांना कुठेही जाण्याची गरज नाही. प्रवाशांच्या समस्या सोडवण्यासाठी आता अधिकारी ट्रेनमध्ये उपस्थित राहणार आहेत.