आधी 'लिव्ह इन' मग लग्न, आजही देशातल्या 'या' ठिकाणी पाळला जातो हा नियम

Wedding Rituals In India: यामध्ये दोघेही काही दिवस एकत्र राहतात. हे घोटुल बांबूंपासून बनवले जाते. घोटूल म्हणजे मोठे अंगण असलेले घर. स्थानिक पातळीवर ते बांबू आणि मातीपासून बनवले जाते. 

Pravin Dabholkar | Updated: Jul 16, 2023, 05:01 PM IST
आधी 'लिव्ह इन' मग लग्न, आजही देशातल्या 'या' ठिकाणी पाळला जातो हा नियम  title=

Wedding Rituals In India: भारत हा संस्कृतीप्रधान आणि विविधतेने परिपूर्ण असलेला देश आहे. त्यामुळे आपल्या समाजासोबत इतर समाजाच्या चालीरीती काय आहेत? याबद्दलही लोकांच्या मनात उत्सूकता असते. भारतात अशीही एक जागा आहे जिथे लग्नापूर्वी लिव्ह-इनमध्ये राहण्याचा नियम आहे. या ठिकाणी लिव्ह-इनमध्ये राहिल्यानंतरच लग्न होते, असे सांगितले जाते. हे ठिकाण आदिवासींचे स्थान मानले जाते. इथले लोक परंपरेने आखून दिलेल्या नियमांना बांधील नाहीत. त्यामुळे इथे लिव्ह-इनशिवाय लग्न होऊ शकेल, असा विचारही करता येत नाही.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या समुहाचे लोक छत्तीसगडच्या बस्तर भागात राहतात. या जमातीचे नाव मुरिया किंवा मुडिया जमात आहे. या जमातीत हा नियम फार जुना आहे. या नियमानुसार मुलगा आणि मुलगी एकमेकांना जाणून घेण्यासाठी लिव्ह-इनमध्ये राहतात. यामध्ये त्यांचे कुटुंबीय आणि समाज त्यांना मदत करतात. एवढेच नाही तर त्यांच्यासाठी घराबाहेर तात्पुरते घर बनवले जाते ज्याला घोटूल म्हणतात.

यामध्ये दोघेही काही दिवस एकत्र राहतात. हे घोटुल बांबूंपासून बनवले जाते. घोटूल म्हणजे मोठे अंगण असलेले घर. स्थानिक पातळीवर ते बांबू आणि मातीपासून बनवले जाते. 

ही जमात बस्तर आणि छत्तीसगडच्या इतर भागात आढळते. काही ठिकाणी त्यांना माडिया नावानेही ओळखले जाते. प्रथेनुसार लग्नाआधी, मुले आणि मुली एकमेकांना जाणून घेण्याचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करतात. एकमेकांसोबत वेळ घालवतात.

काही दिवस एकत्र घालवल्यानंतर ही मुले-मुली स्वतःसाठी जीवनसाथी निवडतात. घोटूलला जाणाऱ्या मुलांना चेलिक आणि मुलींना मोतियारी म्हणतात. आजही या जमातीत हा नियम काटेकोरपणे पाळला जातो. लोक एकमेकांना या नियमाचे पालन करण्यास प्रोत्साहित करतात. हा स्वतःमध्ये एक अतिशय विचित्र नियम आहे. परंतु हे घडतंय हे सत्य असल्याचे सांगितले जाते.