Marriage News: प्रेम..लग्न..मुलं आणि आता धोका! नेमकं काय झालं? वाचा

Marriage News: आपल्या अनेक गोष्टींचा वापर सोशल मीडियावरून सहज करता येतो आणि या माध्यमामुळे अनेक गोष्टी जाणूनही घेता येतात त्यातलाच एक प्रकार म्हणजे सोशल मीडिया डेटिंग (online dating). 

Updated: Nov 25, 2022, 06:52 PM IST
Marriage News: प्रेम..लग्न..मुलं आणि आता धोका! नेमकं काय झालं? वाचा title=

Trending News: सोशल मीडियामुळे सध्या जग (Social Media) अगदी जवळ आले आहे. त्यामुळे आपल्या अनेक गोष्टींचा वापर सोशल मीडियावरून सहज करता येतो आणि या माध्यमामुळे अनेक गोष्टी जाणूनही घेता येतात त्यातलाच एक प्रकार म्हणजे सोशल मीडिया डेटिंग (online dating). सोशल मीडिया डेटिंग हे मग डेटिंग अॅप्सवरील असो वा सोशल मीडियवरील. सध्या डेटिंग अॅप्सपेक्षा फेसबुक आणि इन्टाग्रामवरील (instagram dating) डेटिंग वाढू लागले आहे. सोशल मीडियावर आपण अनोळखी व्यक्तीशी बोलतो. तिच्याशी गप्पा मारतो, मग आपण त्या व्यक्तीला भेटलेलेही नसतो तरीही ती व्यक्ती आपल्याला आवडू लागते. मग आपल्या त्याच्या प्रेम (online love) होतं आणि आपण त्या प्रेमात इतके बुडून जातो की आपल्याला कळतही नाही की आपण त्याच्या प्रेमात किती वाहवत जातो आहोत त्याची. असाच एक प्रकार सध्या मुझफ्फरपुर (muzfarpur) या ठिकाणी घडला आहे. (man marries a girl after online dating have kids but later ditches her)

सोशल मीडियावर अशाच एका मुलाशी बोलणं या एका मुलीला महागात पडलं आहे. भावनिक होऊन आणि प्रेमात अडकून या मुलीची फसवणूक झाली आहे. त्यामुळे तिच्या आयुष्यात एक मोठा (relationships) पेच निर्माण झाला आहे. ही घटना बिहारमधली (bihar) आहे. या मुलीला एका मुलावर सोशल मीडियावरूनच प्रेम बसले. त्यांची ओळख आधी वाढू लागली आणि ते एकमेकांच्या प्रेमात (dating) पडले. आपल्या आयुष्यातलं सगळं काही एकमेकांसोबत शेअर करू लागले. त्या दोघांनी नंतर एकमेकांसोबत लग्न (marriage) केले आणि त्यानंतर त्या दोघांना पुत्रप्राप्तीही झाली (ditching) परंतु त्यानंतर काही दिवसातच त्या दोघांमध्ये एक वेगळंच वादळ निर्माण झालं. त्या मुलानं मात्र आपल्या बायको आणि मुलाला ओळखण्यास चक्क नकारच दिला. 

हेही वाचा - Inspirational Story: गडचिरोलीच्या सुपुत्राची अभिमानास्पद कामगिरी, डॉ. भास्कर हलामी यांची अमेरिकेत वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून नियुक्ती

न्यायासाछी महिलेचा पुढाकार - 

हा प्रकार घडल्यानंतर या महिलेनं आपल्या लहान मुलाला घेत पोलिस ठाणे गाठले. आपल्यााठी न्याय मागण्यासाठी तिनं पोलिसांकडे तक्रारही दाखल केली. समोर आलेल्या माहितीनुसार असेही समजते की या दोघांमध्ये पोलिसांनी समझोताही (police) करून दिला होता परंतु मुझफ्फरपूर नगर पोलिस स्टेशनच्या पोलिसांना हे प्रकरण संपण्याचा प्रयत्न असफल ठरला. ही महिला आसाममधून (assam) आली होती अशी माहिती कळते. पोलिस ठाण्यात दोघांचा समेट करण्यात आला होता, या महिलेनं पोलिसांनाही सगळी महिती पुरवली होती. या माहितीत तिनं सांगितले की ती आसामची असून ती मुझफ्फरपुर शहरातील सिंकदरपूर भागात राहणाऱ्या संजयसोबत 2016 साली फेसबुकवर भेटली. त्यांची मैत्रीही झाली मग संजय कामानिमित्त आसामलाही येयचा. 

हेही वाचा - पत्नीकडे पाहू नको बोलल्याचा राग मनात धरत तो थेट घरात शिरला अन्... थराराक घटना

कशी झाली त्यांची भेट - 

2016 दरम्यान दोघांमधील जवळीक वाढू लागली. जेव्हा प्रेम फुलले तेव्हा दोघेही मंदिरात पोहोचले आणि महिलेने 2019 मध्ये तिच्या पालकांना न सांगता तरुणाशी लग्न केले. लग्नानंतर महिलेने घरच्यांना लग्नाची माहिती दिली. यानंतर महिलेच्या कुटुंबीयांनीही संजयला दत्तक घेतले. महिलेने सांगितले की लग्नानंतर संजय चेन्नईहून (chennai) कामानिमित्त जाऊ लागला. तो दर सहा महिन्यांनी यायचा. 10 ते 15 दिवस त्याच्या जागी राहायचा आणि मग परत जायचा. त्यानं तिला असेही सांगितले होते की तो मुझफ्फरपूरमध्ये इलेक्ट्रिकचे दुकान उघडत आहे त्यामुळे तो तिथे जात आहे. तेव्हापासून तो ओळख पटवण्यास नकार देत आहे.