काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्ष सुरु असताना पंजाबचे मुख्यमंत्री पंतप्रधानांच्या भेटीला

पंजाब काँग्रेस अंतर्गत संघर्ष सुरु असताना पंजाबचे नवे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली, 

Updated: Oct 1, 2021, 06:49 PM IST
काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्ष सुरु असताना पंजाबचे मुख्यमंत्री पंतप्रधानांच्या भेटीला title=

नवी दिल्ली : पंजाबमधील राजकीय गोंधळ सुरु असताना पंजाबचे नवे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली, मुख्यमंत्री चरणजीत चन्नी शुक्रवारी पुन्हा एकदा दिल्लीत पोहोचले आहेत. सायंकाळी चारच्या सुमारास त्यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. 

पीएम मोदींसोबत झालेल्या बैठकीत पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी धान्याची सरकारी खरेदी 10 दिवस पुढे ढकलल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. पंजाब आणि हरियाणामध्ये पावसामुळे धान्याची सरकारी खरेदी 10 दिवस पुढे ढकलण्यात आली आहे. यापूर्वी खरेदी 1 ऑक्टोबरपासून सुरू होणार होती परंतु आता ती 11 ऑक्टोबरपासून सुरू होईल. विशेष म्हणजे, काँग्रेसचे नेते चन्नी यांनी पंजाबचे मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच पंतप्रधान मोदींची भेट घेतली. 

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी म्हणाले की, पंजाबमध्ये धान्य खरेदी 1 ऑक्टोबरपासून सुरू होते, परंतु यावेळी केंद्र सरकारने तारीख वाढवून 10 ऑक्टोबर केली आहे. मी आता ती सुरू करण्याची विनंती केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटल्यानंतर पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी म्हणाले, "मुख्यमंत्री झाल्यानंतर पंतप्रधानांशी सौजन्यपूर्ण भेट झाली, चांगल्या वातावरणात चर्चा झाली. मी त्यांना तीन-विधेयक मागे घेण्यास सांगितले आहे. यासाठी एक उपाय शोधायचा आहे." ते म्हणाले, "मी शेतकऱ्यांना त्यांच्याशी बोलण्यास सांगितले. मी कोविडमुळे बंद झालेले भारत-पाकिस्तान कॉरिडॉर त्वरित उघडण्यास सांगितले आहे जेणेकरून भाविक तेथे जाऊन त्यांचा आदर करू शकतील."

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाब काँग्रेस युनिटमध्ये सुरू असलेल्या गोंधळादरम्यान चन्नी राष्ट्रीय राजधानीच्या दौऱ्यावर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना भेटण्याची शक्यता आहे. पंजाबला रवाना होण्यापूर्वी चन्नी शुक्रवारी संध्याकाळी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेण्याची शक्यता आहे. यापूर्वी गुरुवारी त्यांनी नवज्योतसिंग सिद्दू यांचीही भेट घेतली होती, ज्यांनी पक्षावर नाराज झाल्यानंतर पंजाब काँग्रेसचे अध्यक्षपद सोडले होते.