Tirupati : 'प्रायश्चित करणार आणि 11 दिवसांनंतरच…', तिरुपती लाडूंवरील वादावर पवन कल्याण यांचा पवित्रा

तिरुपति मंदिरात लाडूवरुन वाद निर्माण झाला आहे. यावर आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी दुःख व्यक्त केलंय. यामुळे पुढचे 11 दिवस महत्त्वाचे ठरणार आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Sep 22, 2024, 09:21 AM IST
Tirupati : 'प्रायश्चित करणार आणि 11 दिवसांनंतरच…', तिरुपती लाडूंवरील वादावर पवन कल्याण यांचा पवित्रा title=

आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी शनिवारी घोषणा केली आहे की, तिरुमला लाडू प्रसाद अपिवत्र करण्याच प्रकरण समोर आलं आहे. याबाबत प्रायश्चित करणार आहे. गुंटूर जिल्ह्याच्या नंबूरमध्ये श्री दशावतार व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात 22 सप्टेंबरपासून 11 दिवस "प्रायश्चित दीक्षा' घेणार आहेत. एवढंच नव्हे तिरुपति लाडू प्रसादाच्या या वादावरुन दुःख व्यक्त केलं आहे. पवन कल्याण यांनी सांगितलं की, जगन मोहन रेड्डी यांच्या आधीच्या सरकारच्या काळात घडलेल्या या घटनेने त्यांना दुःख व्यक्त केले आहे. 

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट केलं आहे की, 'आपली संस्कृती, आस्था, विकास आणि श्रद्धा श्री तिरुपती बालाजी धामच्या प्रसादात जनावरांची चरबी आढळल्यामुळे या घटनेमुळे मी वैयक्तिक पातळीवर खूप दुखावलो आहे. मी भगवान व्यंकटेश्वराला प्रार्थना करतो की, तुमच्या अकारण कृपेने आम्हाला आणि सर्व सनातन्यांना या दुःखाच्या क्षणी शक्ती द्यावी.'

प्रसादमध्ये भेसळ केल्याचा मुख्यमंत्र्यांचा आरोप

मागील वायएसआर काँग्रेस पक्षाच्या सरकारने केलेल्या कथित पापांचे प्रायश्चित करण्यासाठी विधी शुद्धीकरण करण्याची शक्ती देण्यासाठी त्यांनी आराध्याला प्रार्थना केली. जनसेना संस्थापक पवन कल्याण यांनी तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) कर्मचारी आणि मंडळाचे सदस्य या कथित अनियमिततेबद्दल अनभिज्ञ कसे राहू शकतात याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. तिरुपती येथील श्री व्यंकटेश्वर मंदिराच्या देखभालीसाठी TTD अधिकृतपणे जबाबदार आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) विधिमंडळ पक्षाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत दावा केला होता की मागील वायएसआर काँग्रेस सरकारने श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरालाही सोडले नाही आणि प्रसिद्ध तिरुपती लाडू बनवण्यासाठी निकृष्ट घटक आणि प्राण्यांची चरबी वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे.