उत्तर भारतात वादळाचा तडाखा, 20 लोकांचा मृत्यू 50 हून अधिक जखमी

उत्तर भारतात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस तर काही ठिकाणी वादळ

Updated: May 13, 2018, 10:18 PM IST
उत्तर भारतात वादळाचा तडाखा, 20 लोकांचा मृत्यू 50 हून अधिक जखमी title=

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात रविवार संध्याकाळी आलेल्या वादळामध्ये 9 लोकांचा मृत्यू झाला आहे तर 34 जण जखमी झाले आहेत. पश्चिम बंगालमध्ये हावडामध्ये जोरदार पाऊस आणि वीज पडल्याने 4 मुलांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय दिल्ली आणि आजुबाजुच्या भागात देखील अचानक 109 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने वारे वाहू लागल्याने वादळ आलं. काही भागात पाऊस देखील झाला. अनेक ठिकाणी झाडं पडल्याने वाहतूक खोळंबली तर विमान सेवेवर देखील याचा परिणाम झाला आहे.

दिल्लीमध्ये मेट्रोची ब्लू, वायलेट आणि मेजैंटा मार्गावरील सेवा खोळंबली आहे. दिल्लीला येणारी अनेक विमानं दुसरीकडे पाठवण्यात आली आहेत. आतापर्यंत 70 विमानांचा मार्ग बदलण्याच आला असून अनेक विमानं रद्द करण्यात आली आहे.