मुलांनी नाही तर पालकांनी शिकाव्यात 'या' गोष्टी सद्गुरुंच्या Parenting Tips

सद्गुरु सांगतात की मूल त्याचा जास्तीत जास्त वेळ त्याच्या पालकांसोबत घालवतो. अशा परिस्थितीत, तो तुमच्याकडून सर्वात जास्त शिकेल. या कारणास्तव, मुलांशी तुमचे वर्तन असे ठेवा जेणेकरून ते तुम्हाला आदर्श मानतील. पालकांपेक्षा चांगला शिक्षक कोणीच असू शकत नाही.

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Jul 3, 2024, 08:43 PM IST
 मुलांनी नाही तर पालकांनी शिकाव्यात 'या' गोष्टी सद्गुरुंच्या Parenting Tips  title=

सद्गुरु सांगतात की मूल त्याचा जास्तीत जास्त वेळ त्याच्या पालकांसोबत घालवतो. अशा परिस्थितीत, तो तुमच्याकडून सर्वात जास्त शिकेल. या कारणास्तव, मुलांशी तुमचे वर्तन असे ठेवा जेणेकरून ते तुम्हाला आदर्श मानतील. पालकांपेक्षा चांगला शिक्षक कोणीच असू शकत नाही.

मुलांच्या संगोपनात दोन गोष्टी कधीच नाकारता येत नाहीत. पहिली गोष्ट म्हणजे, मुलाला जन्म देणं यापेक्षा कोणतीच मोठी आणि खास गोष्ट नाही. तर दुसरे म्हणजे मुलांचे संगोपन. जर आपण इतर कामांबद्दल बोललो तर मुलांचे संगोपन हे सर्वात कठीण काम मानले जाते. पालकत्व ही अशी गोष्ट आहे की ज्यात चूक बरोबर असं काही नसतं. पण काही पालक नकळत पालकत्वात अनेक चुका करतात. अध्यात्मिक आणि गुरु जग्गी वासुदेव उर्फ ​​सद्गुरु म्हणतात की, कोणत्याही कामासाठी एकच नियम नसतो. सद्गुरू सांगतात की, मुलांना शिकवण्यापूर्वी पालकांनीही काही गोष्टी शिकल्या पाहिजेत. सद्गुरूंच्या या वचनांचे पालन केल्याने पालक स्वतःचे आणि मुलांचे जीवन सोपे करू शकतात.

मुलांना आपली संपत्ती समजू नका

सद्गुरु म्हणतात की, पालकांनी हे समजून घेतले पाहिजे की मुले ही तुमची संपत्ती नाही ज्यावर तुम्ही तुमचा हक्क सांगू शकता. बाळाचा जन्म होणे ही आनंदाची बातमी आहे. पण मुलांना तुमच्या भविष्यातील गुंतवणूक समजू नका. त्यांच्यासोबत जीवनाचा आनंद घ्या आणि त्यांच्या सर्व निर्णयांमध्ये त्यांचे समर्थन करा.

मुलांना मोकळे सोडा

सद्गुरु म्हणतात, तुमचे मत मुलांवर लादू नका. तुमचे जीवन, जगण्याचे मार्ग मुलावर लादू नका. त्याला जे व्हायचे आहे, ते होऊ द्या. मी तुमच्या वयात असताना हे केले होते, असे तुमच्या मुलांना पुन्हा पुन्हा सांगू नका. तुम्ही तुमच्या आयुष्यात जे काही केले आहे, ते तुमच्या मुलाला करण्याची गरज नाही. तुमचे मूल अशा गोष्टी देखील करू शकते ज्याचा तुम्ही प्रयत्न केला नसेल.

मुलाला मूलच राहू द्या

सद्गुरु म्हणतात की, जीवनाच्या चक्रात बालपण एकदाच येते. मुलांना त्यांचे बालपण जगू द्या. प्रौढांप्रमाणे वागण्याचा त्यांच्यावर अवाजवी दबाव आणू नका. तो मुलगा आहे म्हणून त्याला मुलासारखे वागू द्या. मुलांचे बालपण हिसकावून घेण्याचा अधिकार त्यांना कोणी दिलेला नाही, हे पालकांनी समजून घेतले पाहिजे.

बॉस नाही मित्र व्हा

सद्गुरु पालकांना सल्ला देतात की, त्यांनी आपल्या मुलांशी बॉस म्हणून नव्हे तर मित्रांप्रमाणे वागावे. मुलांना काय करायचे ते सांगू नका. तो जे करत आहे त्यात त्याला मदत करा. जर कोणी चूक करत असेल तर त्याला सुधारण्यासाठी मदत करा. तुमच्याशी बोलण्यात तो घाबरत नाही किंवा संकोच करत नाही याची जाणीव मुलाला करा.

मुलाला चांगले वातावरण द्या

सद्गुरु म्हणतात की, मुले ज्या वातावरणात राहतात त्याचा सर्वाधिक परिणाम होतो. म्हणूनच सद्गुरु पालकांना त्यांच्या मुलांसाठी घरातील वातावरण चांगले ठेवण्याचा सल्ला देतात, कारण मुले भीती आणि चिंतेमध्ये आनंदी राहू शकत नाहीत. मुलांसाठी नेहमी आनंद आणि आनंदाचे वातावरण राखण्याचा प्रयत्न करा.
सद्गुरु सांगतात की, मूल त्याचा जास्तीत जास्त वेळ आई-वडिलांसोबत घालवतो. अशा परिस्थितीत, तो तुमच्याकडून सर्वात जास्त शिकेल. या कारणास्तव, मुलांशी तुमचे आचरण असे ठेवा की ते तुम्हाला आदर्श बनवतील. पालकांपेक्षा चांगला शिक्षक कोणीच असू शकत नाही.