२०१९ पर्यंत राज्यातील प्रत्येक गरिबाला घर देणार - मुख्यमंत्री

२०१९ पर्यंत राज्यातील प्रत्येक गरिबाला घर देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. 

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Dec 10, 2017, 09:04 AM IST
२०१९ पर्यंत राज्यातील प्रत्येक गरिबाला घर देणार - मुख्यमंत्री title=

धुळे : २०१९ पर्यंत राज्यातील प्रत्येक गरिबाला घर देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. 

याचबरोबर राज्यातील सर्व नगरपालिकांच्या मालमत्तांची सॅटेलाईट मॅपिंग करून सर्व मालमत्ता या रेकॉर्डवर आणण्यात येणार असून त्यामुळे टॅक्स चोरी करणा-यांना आळा बसणार असल्याचही ते म्हणाले. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा नगरपंचायत निवडणूक प्रसार सभेत ते बोलत होते. 

नगरपालिकांमधील भ्रष्ट्राचाराला चाप लावण्यासाठी सरकारनं पाऊलं उचलली असून नगरपंचायतींमध्ये नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून सर्व सेवा या तंत्रज्ञनाच्या माध्यमातून  देण्यात येणार आहेत. त्यामूळे फाईल अडवून नागरिकांकडून पैसा उकळणा-यांना चाप बसणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.