Srinivas Vanga on Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने श्रीनिवास वनगा (Srinivas Vanga) नाराज असून ते घर सोडून गेले आहेत. त्यांचे दोन्ही फोन स्विच ऑफ लागत असल्याने चिंता वाढली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह (Eknath Shinde) बंडात सहभागी झाल्याने पालघरमधून (Palghar) आपल्याला उमेदवारी मिळेल अशी त्यांना आशा होती. पण पालघरचे श्रीनिवास वनगा (Srivinas Vanga) यांना मात्र नशिबाने साथ दिलेली नाही. श्रीनिवास वनगा बंडात सहभागी होऊनही उमेदवारी न मिळालेले एकमेव उमेदवार ठरले आहेत. त्यांच्या जागी राजेंद्र गावित (Rajendra Gavit) यांना संधी देण्यात आली आहे.
संजय राऊत यांनी श्रीनिवास वनगा यांच्या नाराजीबद्दल विचारलं असता ते म्हणाले की, "हे आमदार एकनाथ शिंदेमुळे नाही तर उद्धव ठाकरेंमुळे झाले. पण हे महायश सूरत, गुवाहाटी, गोव्याला गेले. आम्ही टेबलावर त्यांना नाचताना पाहिलं. तेव्हा त्या भागातील अनके शिवसैनिकांना रडू कोसळलं होतं. याला आम्ही निवडून दिलं आणि आज अशा प्रकारे तांडव करत आहे. आता ही कर्माची फळं असतात, आणि ती अनेकांना भोगावी लागतात. एकनाथ शिंदेंनहाी ही कर्माची फळं भोगावी लागणार आहेत. 26 तारखेनंतर एकनाथ शिंदेंनाही रडू कोसळेल".
त्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे खुले आहेत का? असं विचारलं असता या प्रश्नाला अर्थ नाही. पश्चाताप झाला असेल तर घरी बसा असं ते म्हणाले.
"शेतकरी कामगार पक्ष आमचा मित्रपक्ष आहे. यासाठी आमच्या शिवसेनेच्या कोट्यातील रायगडमधील किमान दोन जागा सोडण्यास आम्ही तयार आहोत. काँग्रेस आणि आमच्यात काही टोकाचे मतभेद नाहीत. आघाडीत किंवा कोणत्याही युतीत एखाद्या जागेवरुन शेवटच्या मिनिटापर्यंत चर्चा सुरु असते. म्हणजे त्यावरुन बिनसलं असं नाही. नाना गावंडे यांच्याशी चर्चा झाली. दक्षिण सोलापूरचा विषय मिटवला आहे असं त्यांनी सांगतलं. इतर ठिकाणीही आम्ही समन्वयाने भूमिका घेणार आहोत," असं संजय राऊतांनी सांगितलं.
अमित ठाकरेंना पाठिंबा देणार का? असं विचारलं असता ते म्हणाले, "हा त्या दोन पक्षांचा प्रश्न आहे. मनसे आणि सदा सरवणकरांचा पक्ष हे एकाच आघाडीतील पक्ष आहेत. आम्ही वेगळे लढत आहोत असं ते दाखवत आहेतत. त्या दोन पक्षांनी निर्णय घ्यायचा आहे. आमच्या पक्षात चर्चा होईल तेव्हा त्यासंबंधी निर्णय घेतला जाईल".
पुढे ते म्हणाले की, "दादर-माहीम मतदारसंघात यशवंतराव चव्हाण किंवा जॉर्ड फर्नांडिस निवडणूक लढवत नाही आहेत. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पक्षाचे उमेदवार लढत असतात. अनेक नेत्यांची मुंलं निवडणूक लढत आहेत. राजकारणात करिअर करायचं असेल तर तुम्हाला निवडणूक लढावी लागते. मग माझे वडील, आई, आजोबा कोण आहेत याचा विचार न करत निवडणूक लढायची असते. तुम्ही याचा फार बाऊ करु नका. हे राज्य फार मोठं आहे, आमच्या पक्षातील निर्णय उद्धव ठाकरे घेतील".
शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे.
...Read More|
SIN
(19.3 ov) 110
|
VS |
MAS
111/4(11.4 ov)
|
| Malaysia beat Singapore by 6 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
THA
(20 ov) 153/7
|
VS |
PHI
156/9(19.4 ov)
|
| Philippines beat Thailand by 1 wicket | ||
| Full Scorecard → | ||
|
THA
(13.3 ov) 62
|
VS |
MAS
67/2(5.4 ov)
|
| Malaysia beat Thailand by 8 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.