राजू शेट्टीचा राज्य सरकारवर पुन्हा हल्लाबोल

ही यात्रा मध्य प्रदेशातून महाराष्ट्रातील नंदुरबारमध्ये दाखल झालीय. त्यावेळी त्यांनी सरकारला पुन्हा लक्ष्य केलंय. 

Updated: Jul 9, 2017, 07:43 PM IST
राजू शेट्टीचा राज्य सरकारवर पुन्हा हल्लाबोल title=

नंदुरबार : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला. सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी राजू शेट्टींनी किसान संघर्ष यात्रा काढलीय. 

ही यात्रा मध्य प्रदेशातून महाराष्ट्रातील नंदुरबारमध्ये दाखल झालीय. त्यावेळी त्यांनी सरकारला पुन्हा लक्ष्य केलंय. 

शेतक-यांना हमीभाव मिळत नाही याला सरकारची उदासीनता कारणीभूत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. अल्पशी कर्जमाफी देऊन सरकारने शेतक-यांची थट्टा केल्याचा आरोपही त्यांनी केलाय. याशिवाय जीएसटीवरही शेट्टी यांनी तोंडसुख घेतलं.