'उद्धव रस्त्यावर उतरले तर मंत्र्यांना फिरणं कठिण होईल'

शिवसेना अजून रस्त्यावर उतरलेली नाही. त्यामुळे फक्त कांदे फेकले जात आहेत. जर उद्धव ठाकरे रस्त्यावर उतरले तर भाजपच्या मंत्र्यांना रस्त्यावर फिरता येणार नाही, असा इशारा वजा धमकी आज शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी दिलाय.

Updated: Jun 10, 2017, 06:14 PM IST
'उद्धव रस्त्यावर उतरले तर मंत्र्यांना फिरणं कठिण होईल' title=

मुंबई : शिवसेना अजून रस्त्यावर उतरलेली नाही. त्यामुळे फक्त कांदे फेकले जात आहेत. जर उद्धव ठाकरे रस्त्यावर उतरले तर भाजपच्या मंत्र्यांना रस्त्यावर फिरता येणार नाही, असा इशारा वजा धमकी आज शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी दिलाय.

राऊत नाशिकमध्ये बोलत होते.  शेतकऱ्यांच्या आंदोलनाची ठिणगी दोन महिन्यापूर्वी शिवसेनेनं घेतलेल्या कृषी अधिवशनात पडल्याचा दावाही यावेळी राऊत यांनी केला. 

शिवसेना नेहमी शेतकऱ्यांच्या पाठिशी राहिली आहे... जर सरकारला प्रश्न सोडवता येत नसतील तर त्यांनी सत्ता सोडावी, या विधानाचा राऊत यांनी पुनरुच्चा केला.