रत्नागिरीत संशयित टँकर जप्त; RDX असल्याचा मुंबई कंट्रोल रुमला आला होता फोन

मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुममध्ये आलेल्या फोनकॉलमुळे एकच खळबळ उडाली. RDX घेवून एक टँकर गोव्याच्या दिशेने निघाला असल्याची माहिती देण्यात आली होती. 

Updated: Jul 23, 2023, 04:43 PM IST
रत्नागिरीत संशयित टँकर जप्त; RDX असल्याचा मुंबई कंट्रोल रुमला आला होता फोन title=

Crime News :  रत्नागिरी जिल्ह्यातून एक संशयास्पद टँकर जप्त करण्यात आला आहे. स्फोटक आरडीएक्स टँकरमधून गोव्यात नेत असल्याची फोन मुंबई कंट्रोल रुमला आला होता. त्यातनंतर पोविसांनी रायगड तसेच रत्नागिरी पोलिसांशी संपर्क साधून तातडीने नाकाबंदी करण्याचे आदेश दिले होते.  सर्च ऑपरेशन दरम्यान रत्नागिरी पोलिसांनी एक संशयित टँकर जप्त केला आहे. टँकर चालकालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला आला होता धमकीचा फोन

मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला एक फोन आला होता. RDX घेऊन एक टँकर गोव्याकडे निघालाय. तसेच या  RDX आणि दोन पाकिस्तानी नागरिक देखील या टँकरमधून गोव्याच्या दिशेने जात असल्याने या वक्तीने सांगितले होते. फोन करणाऱ्या व्यक्तीने स्वत:चे नाव पांडे असल्याचं सांगितलं जात आहे. RDX घेऊन एक टँकर गोव्याच्या दिशेने जात असल्याचा फोन पांडे याने मुंबई कंट्रोलरुमकडे केला होता. यानंतर एकच खळबळ उडाली. मुंबई पोलिसांनी तातडीने हालचाली सुरु केल्या.  गोवा पोलिसही अलर्ट मोडवर आले. 

नाकाबंदी दरम्यान टँकर ताब्यात घेतला

फोन कॉल नंतर मुंबई पोलिसांनी रत्नागिरी पोलिसांशी संपर्क साधत सतर्कतेचा इशारा दिला. नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी एक टँकर ताब्यात घेतला. या टँकरमध्ये केमिकल भरले आहे. टँकर ताब्यात घेतल्यानंतर पुढील तपासासाठी तज्ज्ञांच्या पथकाला पाचारण करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. टँकरमध्ये स्फोटक आरडीएक्स ठेवले होते की नाही, याचा तपास पोलिस करत आहेत.

ठाणे पोलिसांच्या कारवाईनंतर धुळे पोलिसांना आली जाग

ठाणे पोलिसांनी मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र सीमेवरती धुळे जिल्ह्यात मोठा शस्त्रसाठा जप्त केल्यानंतर, धुळे जिल्हा पोलिसांना उपरती आली आहे. धुळे जिल्हा पोलिसांनी आता राज्याच्या सीमा भागामध्ये अवैध शस्त्र तस्करीच्या विरोधात मोहीम छेडली आहे. शिरपूर तालुका पोलिसांनी श्रीरामपूर येथील सईद आस मोहम्मद सय्यद याच्याकडून तीन गावठी पिस्तूल आणि आठ जिवंत काडतुस जप्त केल्या आहेत. एकूण साडेसहा लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे. काही दिवसांपूर्वी चार गावठी पिस्तोल पोलिसांनी जप्त केल्या होत्या. त्याच्यामुळे पोलिसांच्या या कारवाईमुळे आता अवैध शस्त्र माफियांचे धाबे दणाणले असले तरी, या कारवाईत सातत्य असले पाहिजे अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांनी व्यक्त केलेली आहे. ठाणे पोलिसांच्या कारवाईनंतर उशिराच शहाणपण धुळे जिल्हा पोलिसांना सुचल्याचे बोललं जात आहे.